भाजपला देशात चायनासारखी लोकशाही आणायची आहे! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

भाजपला देशात चायनासारखी लोकशाही आणायची आहे! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

भाजपला आपल्या देशात चायनासारखी लोकशाही आणायची आहे, अंधःकार पसरवायचा आहे, असा घणाघात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. संपूर्ण देशात भाजपविरुद्ध लाट आहे. चारशेपारचा नारा ते देत असले तरी दोनशेपारही जाणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभर जिथे जिथे जातात, तिथे विरोधकांचा, अन्यायाविरुद्ध बोलणाऱयांचा आवाज दाबला जातो, शेतकऱयांवर कारवाई केली जाते. दहा वर्षे खरोखर देशहिताची, विकासाची कामे केली असतील तर ही दडपशाही करण्याची वेळ का येते, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.

नाशिकच्या सिडको येथे महाविकास आघाडीचे शिवसेना पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सायंकाळी जाहीर सभेत ते बोलत होते. शेतकऱयांवर अत्याचार हाच भाजपचा प्रमुख चेहरा झाला आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकरी, महिला, युवा, गरीब या चार जातींचा शोध लावला आहे. या चारही वर्गांवर मोदी सरकारकडून अन्यायच केला गेला. या देशात फक्त एकाच व्यक्तीची मन की बात ऐकली जाते, असा टोला त्यांनी मोदी यांना हाणला.

शेतकऱयांवर अन्याय केला जातो, महिलांवर अत्याचार करणाऱयांना पाठीशी घातले जाते. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवून नेऊन बेरोजगारी वाढविण्यात आली. महागाईमुळे गरीब जनता त्रस्त आहे. महाराष्ट्रद्वेष्टे, गद्दार, हुकूमशाही, संविधान धोक्यात आणणाऱयांच्या विरुद्ध ही लढाई आहे. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच आमदारकी, खासदारकीच्या पोटनिवडणुका यांनी घेतल्या नाहीत, हा लोकशाहीचा घात आहे. ब्रिटीश आणि भाजपच्या कारभारात फरक नाही, असे टीकास्त्र्ा आदित्य ठाकरे यांनी सोडले. याप्रसंगी उमेदवार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गीते, माकपाचे डॉ. डी. एल. कराड, राजू देसले, दत्ता गायकवाड, प्रा. नीलेश कराळे आदींची भाषणे झाली. सभेला संपर्कप्रमुख जयंत दिंडे, ग्रामीण जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, महानगरप्रमुख विलास शिंदे, आमदार नरेंद्र दराडे, डी. जी. सूर्यवंशी, विनायक पांडे, यतिन वाघ, संजय चव्हाण, निवृत्ती जाधव, देवानंद बिरारी, सचिन मराठे, महेश बडवे, केशव पोरजे, भास्कर गावीत, तानाजी फडोळ यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते हजर होते.

भूलथापा देऊन भाजपला पुन्हा सरकार आणून चायनासारखी लोकशाही आणायची आहे, अंधःकार निर्माण करायचा आहे. पण, लक्षात ठेवा, तुम्ही कितीही ताकदवान असला तरी हा महाराष्ट्र तुम्हाला आडवा केल्याशिवाय राहणार नाही. मशाल प्रत्येकाच्या हृदयात पेटली आहे. भाजप, मिंधे गट फक्त मशालीलाच घाबरतो. देशातील अंधःकार दूर करण्यासाठी मशालीला मतदान करा.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;