रात्री 4-4 तास मी पायऱ्यांवर बसून..; आई-वडिलांच्या भांडणांविषयी रणबीर कपूर व्यक्त

रात्री 4-4 तास मी पायऱ्यांवर बसून..; आई-वडिलांच्या भांडणांविषयी रणबीर कपूर व्यक्त

अभिनेत्री नीतू कपूर या एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होत्या. सत्तरच्या दशकात त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मात्र अभिनेते ऋषी कपूर यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांनी अभिनयक्षेत्रातून ब्रेक घेतला. ऋषी कपूर आणि नीतू कपूर ही जोडी त्यावेळी चांगलीच चर्चेत होती. त्यांचं वैवाहिक जीवन अनेकदा माध्यमांमध्ये चर्चेचा विषय असायचा. आता रणबीरची एक जुनी मुलाखत पुन्हा व्हायरल होऊ लागली आहे. ‘रॉकस्टार’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी त्याने ही मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तो आई-वडिलांच्या भांडणांविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता.

‘द बिग इंडियन पिक्चर’ला दिलेल्या या मुलाखतीत रणबीर म्हणाला, “त्यावेळी मीडियामुळे एवढा फरक पडत नव्हता. कारण मीसुद्धा त्यावेळी खूप तापट होतो. मी माझ्या आईवडिलांसोबत राहतो. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात तो कठीण काळ आला होता, त्याचा साक्षीदार मीसुद्धा होतो. मी ज्या बंगल्यात राहतो, तिथे माझे आई-वडिल खालच्या मजल्यावर मी आणि वरच्या मजल्यावर राहतो. मला अजूनही आठवतंय की मी पायऱ्यांवर चार-चार तास बसून असायचो. रात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत मी त्यांना भांडताना ऐकायचो. त्यांच्या रुममधून मला वस्तूंच्या तोडफोडीचा आवाज यायचा. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा क्षण येतो. फक्त माझे पालक सेलिब्रिटी असल्याने त्यांच्या भांडणाची चर्चा मीडियामध्ये होते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

“आईवडिलांमधील वादाच्या बातम्यांमुळे शाळेत मला थोडीशी लाज वाटायची. अशा घटनांचा उल्लेख तुमचे मित्र तुमच्याकडे करत नाहीत, कारण ते तुमचे चांगले मित्र असतात. पण मला माहित होतं की काय घडतंय. तरीसुद्धा तुम्ही त्याला सामोरं जाता”, असं त्याने पुढे सांगितलं.

नीतू कपूर यांनी 22 जानेवारी 1980 रोजी अभिनेते ऋषी कपूर यांच्याशी लग्न केलं. त्यानंतर त्यांचा ‘गंगा मेरी मा’ हा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सप्टेंबर 1980 मध्ये नीतू यांनी मुलगी रिधिमाला जन्म दिला. तर सप्टेंबर 1982 मध्ये रणबीर कपूरचा जन्म झाला. लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी 2009 मध्ये नीतू कपूर यांनी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केलं होतं. तर एप्रिल 2020 मध्ये ऋषी कपूर यांचं कॅन्सरने निधन झालं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;