ED ला सर्वोच्च न्यायालयाचा झटका; केजरीवाल यांच्या त्या वक्तव्याप्रकरणी सुनावणीस नकार
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एका वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेल्या ईडीला झटका बसला आहे. केजरीवाल यांच्या वक्तव्याविरोधात ईडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत तक्रार दाखल केली होती. ज्यावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यावर विचार करण्यास नकार दिला आहे. ”जर लोकांनी आपली मतं दिली तर ते 2 जूनला पुन्हा तुरूंगात जाणार नाहीत”, असे अरविंद केजरीवाल म्हणाले होते. यावर ईडीने आक्षेप घेतला घेतला होता.
तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या बैठकीत मोठे विधान केले होते. पक्षाच्या नेत्यांनी मेहनत केल्यास 4 जूनला इंडिया आघाडीचे सरकार आले तर आपण तुरुंगात जाणार नाहीत, असे केजरीवाल म्हणाले होते. ‘आप’ तोडून पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जावे म्हणून भाजपने त्यांना जाणूनबुजून तुरुंगात पाठवल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता. मात्र दुर्देवाने भाजपचा डाव उलटा पडला आणि आमचा पक्ष आणखी मजबूत बनला आहे, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List