वन कर्मचाऱयांना इलेक्शन डय़ुटी का? सर्वोच्च न्यायालयाचा उत्तराखंड सरकारला खरमरीत सवाल
देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण प्रत्येक टप्प्यागणिक तापत आहेत. सरकारी कर्मचारी मतदान केंद्रावरील डय़ुटीवर आहेत. याचदरम्यान उत्तराखंडमध्ये जंगलाला लागलेल्या वणव्यावरून सर्वोच्च न्यायालयाने आज उत्तराखंड सरकारला चांगलेच धारेवर धरले. वन अग्निशमन कर्मचाऱयांना मतदान कर्तव्यावर का तैनात केले, असा खरमरीत सवाल सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड सरकारला केला.
जंगलातील वणव्यासंदर्भात सरकारी वकिलांनी न्यायालयाला इत्थंभूत माहिती दिली. यावर सर्वोच्च न्यायालयानेच तुम्ही विभागातील अग्निशमन कर्मचाऱयांना डय़ुटीवर का लावले, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड सरकारच्या वकिलांना केला. जंगलातील वणव्यावर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने पेंद्राकडून निधी मिळणे ही मोठी समस्या आहे. योग्य निधी मिळाला असता तर परिस्थिती बिकट बनली नसती, पेंद्राने राज्याला मदत करावी लागेल, असे वकील म्हणाले.
न्यायालय काय म्हणाले?
एकटय़ा उत्तराखंडमध्ये 280 वणवे लागल्याने सरकारने उपकरणे मिळविण्यासाठी काही केले का, असे खंडपीठाने वकिलाला विचारले. यावर वकील म्हणाले, आम्ही गेल्या वर्षी 1,205 पदे भरली होती आणि उर्वरित प्रक्रिया सुरू आहे, दरम्यान, रिकाम्या जागा का भरल्या जात नाहीत असे विचारले असता वकिलांनी आम्ही भरती प्रक्रियेत असल्याचे वकील म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List