गडचिरोली: भामरागड जंगलात पोलीस नक्षलीवाद्यांमध्ये चकमक; तीन नक्षली ठार
गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन नक्षली ठार झाल्याचे वृत्त आहे. मृतांमध्ये एक पुरुष आणि दोन महिला नक्षल्यांचा समावेश असल्याचं सांगण्यात आलं आहे.
गडचिरोली जिल्ह्यात नक्षली पेरिमिली दलमचे काही सदस्य भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने तळ ठोकून असल्याची विश्वसनीय माहिती सकाळी मिळताच विशेष पथकाचे अधिकारी यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सी60 च्या दोन तुकड्या तातडीने परिसरात शोधा मोहीम आखली. पथके परिसरात शोध मोहीम करत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, ज्याला C60 पथकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. गोळीबार थांबल्यानंतर आणि परिसराची झडती घेतल्यानंतर 1 पुरुष आणि 2 महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.
गोळीबाराच्या ठिकाणाहून तीन स्वयंचलित शस्त्रे – 1 एके 47, 1 कार्बाइन आणि 1 इन्सास, नक्षल साहित्य आणि अन्य महत्त्वाची सामुग्रीही जप्त करण्यात आली आहे. हे मृतदेह प्रामुख्याने पेरिमिली दलमचे प्रभारी आणि कमांडर डीव्हीसीएम वासू यांचे आहेत. इतर सदस्यांची ओळख पटवली जात आहे. परिसरात पुढील शोध आणि नक्षलविरोधी कारवाई सुरू आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List