माझ्यासमोर आव्हान नाही तर विजयाचा विश्वास आहे; चंद्रकांत खैरे यांचा दावा
लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात 11 मतदारासंघात मतदान होत आहे. या 11 मतदारसंघात छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, रावेर, पुणे, बीड, नंदुरबार, नगर, शिरूर, जालना, जळगाव आणि मावळ या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच त्यांनी विजयाबाबत विश्वास व्यक्त केला आहे. ही माझी शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे माझ्यासमोर आव्हान नाही तर विजयाचा विश्वास आहे, असे खैरे म्हणाले.
चंद्रकांत खैरे म्हणाले की, ही माझी शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे मला विजयाची पूर्णपणे खात्री आहे. शिवसेनेसोबत गद्दारी करून जे लोक गेले आहेत. जनतेत त्यांच्याबाबत रोष आहे. गद्दार माझ्याविरोधात उभे आहेत. त्यामुळे माझ्यासमोर कोणाचेच नाही. जनतेने आता निवडणूक आपल्या ताब्यात घेतली आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. मी सहाव्यांदा निवडणूक लढवत आहे. त्यामुळे ही निवडणूक माझी अखेरची निवडणूक असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List