‘घरोघरी मातीच्या चुली’मधील ऐश्वर्या-सारंगच्या लग्नातील पैठणी थीमची चर्चा
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत सध्या ऐश्वर्या-सारंगच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. हळद, मेहंदी आणि संगीत पार पडल्यानंतर अखेर विवाहसोहळ्याचा तो क्षण जवळ आला आहे.
ऐश्वर्याचं लग्न सारंगसोबत होणार की सौमित्रसोबत याची उत्सुकताही क्षणाक्षणाला वाढतेय. हळद, मेहंदी आणि संगीत सोहळ्यातल्या लक्षवेधी लूकनंतर आता विवाहसोहळ्यात रणदिवे आणि विखेपाटील कुटुंबाने पारंपरिक पोशाखाला पसंती दिली आहे.
लग्नात पैठणीची थीम असल्यामुळे संपूर्ण कुटुंब पैठणीच्या रंगात न्हाऊन निघालं आहे. ऐश्वर्या आणि जानकीने नऊवारी साडी आणि पारंपरिक मोत्यांच्या दागिन्यांना पसंती दिलीय. तर तिकडे ऋषिकेशचं पैठणी जॅकेट सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List