फिरकीवीरांना सन्मान देणे शरमेची बाब नव्हे; वीरूने रोहित-सूर्याला खडसावले
कोलकाता – फिरकीवीरांच्या चांगल्या चेंडूंना सन्मान देणे ही शरमेची बाब नाही. त्यांना सन्मान दिलात तर तुम्ही त्यांच्या कमकुवत चेंडूंना पह्डून काढण्यासाठी खेळपट्टीवर उभे राहू शकाल. फलंदाजांनी खेळपट्टीवर फलंदाजीला येताना आपला अहंकार बाजूला ठेवून मैदानात उतरायला हवे, अशी खडे बोल हिंदुस्थानचा आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवागने मुंबई इंडियन्सचे स्टार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवला सुनावले.
मुंबई इंडियन्सला कोलकात्याविरुद्ध विजयाची नामी संधी होती. फक्त रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने थोडे संयमाने खेळायला हवे होते आणि आपली विकेट फेकायला नको होती, असे सेहवागचे म्हणणे होते. रोहितने आपली विकेट स्वस्तात फेकल्यामुळे मुंबईला आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे वीरू रोहितच्या फलंदाजीवर चांगलाच संतापला होता. जर एक फलंदाज एका गोलंदाजाचा आदर ठेवू शकत नसेल तर किमान त्याच्या चांगल्या चेंडूंचा तरी आदर ठेवायलाच हवा. रोहित आणि सूर्याने फिरकीच्या चांगल्या चेंडूंना खेळून काढले असते तर ते नक्कीच खेळपट्टीवर टिकले असते आणि सामना मुंबईच्या खिशात असता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List