मुंबईसह कोकणात अवकाळी पावसाची शक्यता; विदर्भ, मराठवाड्यात गारपीटीचा अंदाज
राज्यात उन्हाचे चटके बसत असताना अनेक जिल्ह्यात पारा 40 अंशांवर गेल्याने उकाडा असह्य होत आहे. त्यातच आता वातावरणात बदल झाल्याने मुंबईसह कोकणात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसासही काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यातील बहुतांश भागात उन्हाचा चढता पारा कायम आहे. आता काही जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये पुढील पाच दिवस पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. मुंबईत आर्द्रता वाढल्याने असह्य उकाडा जाणवत आहे. रात्रीही असह्य उकाडा जाणवत आहे. उत्तरेकडून येणारे कोरडे आणि समुद्रावरील बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे मुंबई, ठाणे आणि पालघर भागांत पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पुढील पाच दिवस विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. वातावरणातील बदल आणि वाढलेली आर्द्रता आणि समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे यामुळे राज्यात अवकाळी राऊस आणि गारपीटीचे वातावरण तयार झाले आहे. पुढील पाच दिवस विदर्भ, मराठवाडा, खान्देश व पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात वादळ, गारपीटी होण्याची शक्यता आहे. मुंबई, उपनगरासह कोकणातील ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List