दक्षिणेत साफ तर उत्तरेत हाफ अशी भाजपाची स्थिती होईल, काँग्रेसचा मोदी सरकारवर जोरदार हल्ला
तीन टप्प्यांतील मतदानानंतर सर्व काही स्वच्छ दिसत आहे. दक्षिणेत साफ तर उत्तरेत हाफ अशी भाजपाची स्थिती होणार आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मतदानाची आकडेवारी जनतेचा काwल इंडिया आघाडीच्या बाजूने असल्याचे सांगितले. ही निवडणूक ऐतिहासिक असून इंडिया आघाडीचेच सरकार येईल, असेही ते म्हणाले. 2004 सारखी स्थिती 2024 मध्ये असेल याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पुढच्या टप्प्यापर्यंत इंडिया आघाडी बहुमताच्या आकडय़ाजवळ पोहोचलेली असेल, असा विश्वासही जयराम रमेश यांनी व्यक्त केला. 19 एप्रिलच्या पहिल्या टप्प्यानंतरच भाजपाची दक्षिणेत साफ तर उत्तरेत हाफ अशी स्थिती होईल हे चित्र स्पष्ट झाले होते, असे ते म्हणाले. 27 एप्रिलच्या दुसऱया टप्प्यानंतर भाजपा दक्षिणेकडे पूर्णपणे साफ होईल तर उत्तर आणि मध्य हिंदुस्थानात 2019 च्या तुलनेत भाजपाचे संख्याबळ अर्धे होईल, असेही ते म्हणाले. तीन टप्प्यांतील मतदानानंतर 2004 मध्ये जी स्थिती होती तशीच स्थिती 2024 मध्ये दिसेल, असे जयराम रमेश म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List