डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण; 11 वर्षांनी निकाल लागला, सचिन अंदूरे, शरद कळसकर यांना जन्मठेप

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण; 11 वर्षांनी निकाल लागला, सचिन अंदूरे, शरद कळसकर यांना जन्मठेप

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाची पुण्यातील विशेष न्यायालयाकडून सुनावणी पूर्ण झाली असून शुक्रवारी या प्रकरणाचा निकाल जाहीर केला. 11 वर्षांनंतर हे प्रकरण निकाली निघणार असल्याने अवघ्या महाराष्ट्राचे या निकालाकडे लक्ष लागले होते. या प्रकरणातील पाच आरोपींपैकी सचिन अंदूरे, शरद कळसकर यांना दोषी मानून त्यांना जन्मठेप सुनावली आहे.तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

पुण्यातील महर्षी शिंदे पुलावर 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या गोळीबारामध्ये डॉ. दाभोलकर यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा सुरुवातीचा तपास पुणे पोलिसांनी केला. त्यानंतर एटीएसने हा तपास पुढे सुरू ठेवला. त्यानंतर एटीएसकडून हा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग करण्यात आला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्धव ठाकरे यांनी ‘पंजा’वर तर राज ठाकरे यांनी ‘धनुष्यबाणावर’ केलं मतदान? उद्धव ठाकरे यांनी ‘पंजा’वर तर राज ठाकरे यांनी ‘धनुष्यबाणावर’ केलं मतदान?
महायुती आणि महाविकास आघाडीच्या समीकरणामुळं ठाकरे बंधूंसाठी सुद्धा ही निवडणूक वेगळी ठरली. उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान केलं. तर...
संथ गतीनं मतदानावर उद्धव ठाकरेंचा संताप, पियुष गोयलही भडकले!
देशभरातून महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान, कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान, कुणाला संधी?
मधमाशांचा हल्ला झाला तर हे काम करा, हे चार उपाय फायद्याचे
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात हिंगोली अव्वल! मराठवाड्यात प्रथम तर राज्यात पाचव्या क्रमांकावर
बीड, बारामतीत बोगस मतदान झाले! शरद पवार यांचा स्पष्ट आरोप
मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही! मनोज जरांगे पाटील यांचा खुलासा, 4 जूनपासून उपोषणावर ठाम