भाजप महाराष्ट्रातून हद्दपार होणार! विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विश्वास

भाजप महाराष्ट्रातून हद्दपार होणार! विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विश्वास

लोकसभा निवडणूक ही देशाची असते. इंदिरा गांधींसह अनेक पंतप्रधान होऊन गेले. मात्र, त्यांनी महाराष्ट्रात निवडणुकीसाठी केवळ एक ते दोन सभा घेतल्याचे दिसून येते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्धव ठाकरे यांना घाबरले असून, त्यांना सगळीकडे ठाकरे दिसतात. म्हणून मोदींना छोटय़ा छोटय़ा गावांसह महाराष्ट्रात तब्बल 20 सभा घ्याव्या लागल्या. पंतप्रधानांनी कितीही सभा घेतल्या तरी शिवसेनेचे मशाल चिन्ह हे विशाल विजय घेऊन जाणार असून, महाराष्ट्रातून भाजप हद्दपार होईल, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ सोनई येथे झालेल्या मेळाव्यात अंबादास दानवे बोलत होते. यावेळी आमदार नितीन देशमुख, शिवसेना संपर्पप्रमुख आमदार सुनील शिंदे, आमदार शंकरराव गडाख, अंकित प्रभू, शिवसेना उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, उदयन गडाख, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ शेळके आदी उपस्थित होते.

देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार असे चित्र निर्माण झाले आहे. महागाई, बेरोजगारी, उद्योगधंद्यांबाबत यांची पूर्वीची भाषणे बघा. आज त्याच्यावर बोलायला तयार नाही. भाजपने पिकाला भाववाढ केली नाही, कांदा निर्यातबंदी केली, त्यानंतर फक्त गुजरातची निर्यातबंदी उठवली. त्यामुळे गोंधळ उडाल्यानंतर कांदा निर्यातीला परवानगी दिली. याचा शेतकऱयांना काहीच फायदा होणार नाही, असे अंबादास दानवे यांनी सांगितले.

भाजप 200 पार पण होत नाही
देशात उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगालमध्ये भाजपला फटका बसणार आहे. येथे त्यांचे कमी खासदार निवडून येणार असले तरी भाजप चारशे पारचा नारा देत आहे. आम्ही छातीठोकपणे सांगतो की भाजप 200 पार होत नाही, असे दानवे म्हणाले.

‘रामा’च्या विरोधात नाही हरामाच्या विरोधात
प्रभू श्रीराम हे एकटय़ा भाजपचे नाहीत. आम्ही रामाच्या विरोधात नसून, हरामाच्या विरोधात आहे. भाजपने लोकसभा निवडणूक मुद्दय़ावरून गुद्दय़ावर नेण्यासाठी अनेक गोष्टी उकरून काढल्या. यांना रामाचं आणि विकासाचं काही घेणे-देणे नाही, देश हुपूमशाहीकडे नेण्याचे यांचे षडयंत्र आहे, असे अंबादास दानवे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;