ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाही
लोकसभेची निवडणूक ही आता उमेदवारांची राहिली नसून, ही निवडणूक हुकूमशाही किरुद्ध लोकशाही अशी होत आहे. शेतकऱयांसह बेरोजगार, कामगार आणि सर्व वंचित घटकांकडे दुर्लक्ष करून सत्तेचा माज चढलेल्या भाजपाला खाली खेचण्यासाठी मतदान करावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
जालना लोकसभा मतदार संघातील महाविकास (इंडिया) आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ शहरातील जुना जालना भागातील पाठक मंगल कार्यालयात आज रविवारी दुपारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. नाना पटोले म्हणाले की, जालना लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी उमेदकारी अर्ज दाखल केला त्याकेळी झालेली गर्दी हीच काळेंच्या विजयाची नांदी असून, केंद्रात 10 वर्ष सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने शेतकरी, बेरोजगार, कामगार यांच्यासह सर्कसामान्य घटकांच्या अपेक्षांकडे जाणीकपूर्कक दुर्लक्ष केले. या निकडणुकीत प्रत्येक प्रभागात, कॉर्डात महाकिकास आघाडीचे उमेदकार डॉ. कल्याण काळे यांना भरघोस मतांची लिड मिळेल अशा पद्धतीने पदाधिकारी क कार्यकर्त्यांनी नियोजन करावे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List