नेपाळी व्यक्तींचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
रत्नागिरी जिल्ह्यात दोन नेपाळी व्यक्तींचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना काही दिवासंपूर्वी घडली होती. मात्र आता पोलिसांना या खूनातील आरोपीला पकडण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार खडकबहादूर बलराम थापा क्षेत्री (वय 72) आणि भक्तबहादूर बलराम थापा क्षेत्री (वय 67) यांचा धारधार हत्याराने खून करण्यात आला होता. दोघेही गोळप येथील आंबा बागेत राखणी करण्याचे काम करत होते. त्यामुळे पोलिसांनी आजूबाजूच्या आंबा बागायतदार आणि त्यांच्या बागेतील गुरख्यांची चौकशी केली. पोलिसांनी चौकशी केली असात गोळप येथील आंबा बागेत राखण करणारा नेपाळी सरणकुमार उर्फ गोपाळ क्षतीराम विश्वकर्मा (वय 58) याने खून केल्याची माहिती उघड झाली. खून करण्यामगचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईणकर करत होते. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणला तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List