…तर आम्ही 50 टक्क्यांची मर्यादा हटवू; आरक्षणावरून राहुल गांधी यांचे PM मोदींना आव्हान

…तर आम्ही 50 टक्क्यांची मर्यादा हटवू; आरक्षणावरून राहुल गांधी यांचे PM मोदींना आव्हान

पुण्यात महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासाठी राहुल गांधी यांची सभा झाली. या सभेत राहुल गांधी यांनी भाजप, आरएसएस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. ‘ही लढाई संविधान वाचवण्याची आहे. एकीकडे काँग्रेस पक्ष, इंडिया आघाडी संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहे. दुसरीकडे नरेंद्र मोदी हे, आरएसएस हे संविधान संपवण्याचा घाट घालत आहेत. हे संविधान बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांनी मिळून हिंदुस्थानच्या जनतेसोबत कित्येक वर्षे संघर्ष करून संविधान देशाला दिले. हे संविधान नरेंद्र मोदी आणि भाजप बदलवण्याच्या आणि संपवण्याच्या प्रयत्न करत आहेत’, असा घणाघात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.

संविधानामुळेच हिंदुस्थानातील गरीबांना, शेतकऱ्यांना, मागासवर्गीयांना, दलितांना, आदिवासींना, अल्पसंख्यकांना आणि दुर्बल घटकांना हक्क मिळतात. संविधानाशिवाय तुम्ही काहीच नाही. जे काही तुमच्याकडे आहे ते सर्व 20-25 धनाढ्यांच्या हाती जाईल. मनरेगा, भूसंपादन कायदा, हरित क्रांती, धवल क्रांती, बँकांचे राष्ट्रीयीकरण हे सर्व संविधानामुळे झालं आहे. ज्या दिवशी संविधान संपेल, ज्या दिवशी भाजप खरंच हे संविधान संपवेल तेव्हा तुम्ही हिंदुस्थान ओळखू शकणार नाही. आंबेडकर आणि महात्मा गांधींनी जे दिलं, ते (संविधान) आपण संपवू देणार नाही, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.

भाजपचे नेते कधी संविधान बदलवण्याची भाषा करतात, तर कधी म्हणतात आरक्षण संपवून टाकू. मोदींनी फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. आरक्षणाची जी 50 टक्क्यांची मर्यादा घातली आहे, ती हटवणार हे फक्त मोदींनी कुठल्याही भाषणात जाहीर करावं, असं आव्हान राहुल गांधी यांनी दिलं. आरक्षणावर घातलेलील 50 टक्क्यांची कृत्रिम मर्यादा ज्यामुळे कोट्यवधी नागरिकांचे नुकसान होत आहे, ती आम्ही निवडणुकीनंतर सत्तेत आल्यावर हटवून टाकू, अशी ग्वाही राहुल गांधी यांनी यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;