मणिपूरमध्ये वर्षभरातील हिंसाचारात 226 जणांचा मृत्यू; 1,500 जखमी, 60 हजार विस्थापित आणि 22 ‘बेपत्ता’
गेल्या वर्षी 3 मे रोजी, मणिपूरमधील मैतेई आणि कुकी समुहांमधील दीर्घकाळ चाललेला तणाव हिंसाचारात रुपांतरीत झाला. ज्यामध्ये पहिल्या तीन दिवसांत किमान 52 लोकांचा मृत्यू झाला होता. वर्षभराच्या कालावधीत, ही संख्या वाढतच गेला – मागील वर्षात संघर्षात किमान 226 जणांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये 1,500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत, सुमारे 60,000 लोक राज्यातच अन्य ठिकाणी विस्थापित झाले आहेत आणि किमान 13,247 वास्तू उद्ध्वस्त किंवा नष्ट झाल्या आहेत. किमान 28 लोक बेपत्ता आहेत किंवा अपहरण किंवा हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या संघर्षाच्या पहिल्या आठवड्यात, मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि जाळपोळ झाल्यानंतर, सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. चुराचंदपूर, कांगपोकपी आणि मोरेह सारख्या कुकी-झोमी बहुसंख्य भागात राहणाऱ्या मैतेईंना मैतेई-बहुसंख्य खोऱ्यात नेण्यात आले. इम्फाळमधील कुकी-झोमी आणि इतर मैतेई-बहुसंख्य भागात चुराचंदपूर आणि कांगपोकपी येथे नेण्यात आले, तर अनेकांनी राज्यातून शेजारच्या मिझोराममध्ये किंवा देशातील इतरत्र पळ काढला.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे इंडियन एक्स्प्रेसनं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ‘हिंसाचाराचं प्रमाण कमी झालं असून प्रसारही कमी झाला आहे’, असं त्यांनी म्हटलं आहे. 13 एप्रिलपासून, कांगपोकपी जिल्ह्यात दोन पुरुषांची हत्या आणि बिष्णुपूर जिल्ह्यातील सीआरपीएफ चौकीवरील हल्ल्यात दोन सीआरपीएफ जवानांचा मृत्यू झाल्यामुळे पुन्हा हिंसक घटनांना उधाण आलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List