निवडणुकीत पैसा खर्च होतोच, काळ्या पैशांशिवाय दुसरा पर्यायच नाही; निवडणूक रोख्यांबाबत अमित शाह यांचे वादग्रस्त विधान

निवडणुकीत पैसा खर्च होतोच, काळ्या पैशांशिवाय दुसरा पर्यायच नाही; निवडणूक रोख्यांबाबत अमित शाह यांचे वादग्रस्त विधान

लोकसभा निवडणुकीत निवडणूक रोखे म्हणजेच इलेक्टोरल बाँडचा विषय गाजत आहे. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत निवडणूक रोखे हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे म्हटले आहे. आता निवडणूक रोख्यांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपली भूमिका स्पष्ट करत याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. आता रोखे व्यवस्था अस्तित्वात नाही. पण निवडणुका चालूच आहेत. खर्चही कमी होत नाहीये. जो कुणी खर्च करतोय, तो खर्च कसा होतोय? काळ्या पैशांशिवाय दुसरा कुठला पर्यायच उरलेला नाही, असे अमित शहा म्हणाले आहेत.

निवडणूक रोख्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून अशा निकालाची अपेक्षा नव्हती, असे शहा म्हणाले आहेत. मला अशा निकालाची अपेक्षा नव्हती. निवडणूक रोख्यांची व्यवस्था नीट समजून घेतली पाहिजे. आता रोखे व्यवस्था अस्तित्वात नाही. पण निवडणुका चालूच आहेत. खर्चही कमी होत नाहीये. जो कुणी खर्च करतोय. तो सगळा कसा होतोय, काळ्या पैशाशिवाय दुसरा कुठला पर्यायच उरलेला नाही. दुसरा कोणताही पर्याय दिल्याशिवाय निवडणूक रोख्यांचा पर्याय बंद झाला. कधी ना कधी सर्वोच्च न्यायालयाला यावर पुनर्विचार करावा लागेल, असेही शहा म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

एक देश, एक निवडणूक अर्थात देशभरातील सर्व विधानसभा व लोकसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याची योजना मोदी सरकारने जाहीर केली आहे. त्यावर बोलताना ही योजना कशा प्रकारे राबवली जाईल, याचे नियोजन कसे केले जाणार आहे, याबाबतही शहा यांनी माहिती दिली. देशात 60 च्या दशकापर्यंत वन नेशन, वन इलेक्शन अस्तित्वात होते. इंदिरा गांधींनी सामुहिकरीत्या विरोधकांची सरकारे पाडली तेव्हा हे गणित बिघडले. आता कायदा करून या निवडणुका एकत्र करण्याची गरज आहे. पाच वर्षांत पक्ष एकदाच जनतेसमोर जातील, मतदार एकदाच मतदान करतील आणि ज्याला बहुमत मिळेल, तो सरकार चालवेल. यात अडचण काय आहे? असा सवाल अमित शाह यांनी केला आहे. ज्यांची टर्म शिल्लक आहे, ती कुणीही संपवू शकत नाही. नवीन टर्म मात्र 2029 पर्यंतच असेल, त्यानंतर नवीन निवडणुका घेऊन पुढे पाच वर्षांसाठी सरकारची निवड होईल. या काळात निवडून आलेली सरकारे कुणीही पाडणार नाही. 2029 पासून सर्व सरकारं पाच वर्षांसाठी निवडली जातील, असेही शहा यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;