केजरीवालांना लोकसभा निवडणुकीवेळीच अटक का? पुढच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे उत्तर देण्याचे निर्देश

केजरीवालांना लोकसभा निवडणुकीवेळीच अटक का? पुढच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे उत्तर देण्याचे निर्देश

ईडी, सीबीआय आणि आयटीच्या आडून विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात डांबण्याच्या मोदी सरकारच्या टायमिंगवरून आज सर्वोच्च न्यायालयाने ईडीला चांगलेच काsंडीत पकडले. कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीवेळीच अटक का केली, असा सवाल न्यायालयाने ईडीला केला. त्याचबरोबर केजरीवाल यांना वारंवार पाठवण्यात आलेली समन्स आणि त्यांच्या अटकेची वेळ यांमध्ये इतके अंतर का? याचेही उत्तर देण्यास सांगितले. 3 मे रोजी पुढील सुनावणी होणार असून त्या वेळी आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने ईडीला दरडावले.

आयुष्य आणि स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाचे

न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने ईडीची बाजू मांडणारे अतिरिक्त महाधिवक्ता एस.व्ही. राजू यांना केजरीवाल यांच्या अटकेचे असे टायमिंग का निवडण्यात आले याचे उत्तर देण्यास सांगितले. तसेच कुणाही व्यक्तीचे आयुष्य आणि त्याला मिळालेले स्वातंत्र्य हे त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि तुम्ही त्याचा इन्कार करू शकत नाही, याकडेही न्यायायलयाने राजू यांचे लक्ष वेधले.
दरम्यान, लोकसभा निवडणूका 16 मार्चला जाहीर झाल्या आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांना 24 मार्चला ईडीने अटक केली.

सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला सवाल

– वारंवार समन्स पाठवल्यानंतरही विशिष्ठ काळानंतरच केजरीवाल यांच्याविरोधातील कारवाईला वेग का आला?

– या प्रकरणात आतापर्यंत कोणतीही जप्तीची कारवाई केलेली नाही. जर तशी कारवाई केली असेल तर ईडीने काय कारवाई केली ते न्यायालयापुढे मांडावे.

– मद्य धोरण घोटाळ्यात केजरीवाल यांचा नेमका कसा सहभाग आहे. कोणत्याही न्यायिक कार्यवाहीशिवाय केजरीवाल यांना अटक करता आली असती का?

– मनिष सिसोदिया प्रकरणातील खटल्याचे दोन भाग आहेत. एक भाग सिसोदियांच्या बाजूने आहे आणि दुसऱया बाजूने नाही. केजरीवाल यांचे प्रकरण नेमके कोणत्या बाजूने आहे?

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;