पंतप्रधान भटकती आत्मा कोणाला म्हणाले माहिती नाही; अजित पवारांची सावध भूमिका

पंतप्रधान भटकती आत्मा कोणाला म्हणाले माहिती नाही; अजित पवारांची सावध भूमिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल पुण्यात सभा झाली. या सभेत त्यांनी भटकती आत्मा असा उल्लेख करत टीका केली. एवढया खालच्या पातळीवर टीका करण्यावरून मोदींवर नाराजी व्यक्त होत आहे. तसेच अनेक नेत्यांनीही पंतप्रधानांनी अशाप्रकारचे वक्तव्य करणे योग्य नाही, असे म्हटले आहे. पंतप्रधानांनी हा उल्लेख ज्येष्ठ नेत्याबाबत केल्याने संताप व्यक्त होत आहे. तर पंतप्रधानांनी हे वक्तव्य नेमके कोणाबाबत केले, ते माहिती नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे.

पुण्यातील एका सभेत मोदी म्हणाले की, ज्यांची स्वप्ने पूर्ण होत नाहीत त्यांचे आत्मे भटकत राहतात. 45 वर्षांपूर्वी आपल्या महत्वाकांक्षापोटी सरकार अस्थिर करण्याच्या खेळाची त्यांनी सुरूवात केली. तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरता आली आहे. त्यानंतर राज्यातील अनेक मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळही पूर्ण करू शकले नाहीत. 1995 साली भाजप-शिवसेना युतीची सत्ता आल्यानंतर त्यावेळीही तो आत्मा त्या सरकारला अस्थिर करत होता. आता फक्त राज्याला नाही तर देशाला अस्थिर करण्याचे काम हा आत्मा करत आहे, अशी टीका मोदींनी शरद पवारांचे नाव न घेता केली. या विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून त्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. याबाबत अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील सभेत पंतप्रधान मोदी नेमके कोणाला भटकती आत्मा म्हणाले ते मला माहिती नाही. ते कोणाला म्हणाले, ते कळायला मी ज्योतिषी नाही. आता या नंतरच्या सभेत मोदी मला भेटतील तेव्हा ते भटकती आत्मा कोणाला म्हणाले आणि त्यांचा त्यामागचा उद्देश काय होता. हे त्यांना विचारणार आहे. त्यांनी उत्तर दिल्यावर त्याबाबतची माहिती आपण देणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;