पराभवाच्या भीतीने सत्ताधारी अस्वस्थ, तर सर्वसामान्यांना ईव्हीएमवर शंका; शरद पवारांनी भाजपवर डागली तोफ

पराभवाच्या भीतीने सत्ताधारी अस्वस्थ, तर सर्वसामान्यांना ईव्हीएमवर शंका; शरद पवारांनी भाजपवर डागली तोफ

लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्याचे मतदान झाले आहे. या दोन टप्प्यात भाजपला पराभव स्पष्टपणे दिसत आहे. तसेच अनेक ठिकाणी त्यांना उमेदवार मिळत नाही. पराभवाच्या भीतीमुळे अनेकजण उमेदवारी नाकारत असल्याची चर्चा आहे. राज्यातील आणि देशातील या राजकीय परिस्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सर्वसामान्य जनतेच्या मनात ईव्हीएमबाबत साशंकता आहे. अनेकांनी आपल्याकडे ही शंका बोलून दाखवल्याचे ते म्हणाले.

आपण अनेकांशी संपर्क साधत आहोत. जनमत महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. भाजपविरोधात जनतेत रोष आहे. त्यामुळे पराभवाच्या भीतीने सत्ताधारी असहाय्य आणि अस्वस्थ झाले आहेत. त्या नैराश्यामुळे ते सातत्याने वैयक्तिक आरोप करत आहेत. पण लोकांवर अशा आरोपांचा परिणाम होत नाही, त्यामुळे चिंता करण्याचे नाही, असेही शरद पवार म्हणाले.

आपण अनेक लोकांना भेटतो, त्यांच्या प्रतिक्रिया ऐकतो. अनेकजण मला म्हणतात की, आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहोत, पण तेवढं ते ईव्हीएम मशीनचे बघा. या मशीनबाबत लोकांच्या मनात आजही शंका आहे. जनतेप्रमाणेच अनेक पक्षांनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली आहे. जनतेच्या मनात ईव्हीएमबाबत आजही शंका असल्याचे ते म्हणाले.

आतापर्यंत बारामतीला मी एकच सभा घेतली. ती प्रचारसभेचे नारळ फोडण्यासाठी घेतलेली सभा होती. अनेक वर्षांपासून लोकांशी संवाद सुरू आहे, तो आजही आहे. त्यामुळे लोकांची साथ आम्हाला मिळेत आहे. जनमत आमच्या बाजूने असल्याने महाविकास आघाडीचा विजय होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकसभेच्या निवडणुकीत लोकांची मानसिकता वेगळी असते. सुप्रिया सुळे खासदार म्हणून प्रभावी आहेत. त्यांना तीनवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे काम देश पातळीवर नावाजलेले आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची खात्री आहे, असेही शरद पवार म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;