31 मेपूर्वी दहावी – बारावीचे निकाल लागणार, उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण

31 मेपूर्वी दहावी – बारावीचे निकाल लागणार, उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण

दहावी, बारावीचे निकाल 31 मेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने जाहीर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीचा उत्तरपत्रिका तपासणीवर कोणताही परिणाम झालेला नाही. उलट दरवर्षीपेक्षा यंदा निकालाचे काम लवकर आटोक्यात आले असून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे दहावी आणि बारावी असे दोन्ही निकाल 31 मेपूर्वीच जाहीर करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

दरवर्षी बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात तर दहावीच़ा निकाल जूनच्या पहिल्या, दुसऱया आठवडय़ात जाहीर करण्यात येतो. यंदा मात्र दोन्ही निकाल मे महिन्यातच लागण्याची शक्यता आहे.

आरटीई अंतर्गत शाळाप्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत देणार असल्याचेही प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी म्हणाले. आरटीईच्या 25 टक्के कोटय़ातून शाळा प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत उद्या, 30 एप्रिल रोजी संपणार आहे. आतापर्यंत उपलब्ध जागेच्या तुलनेत फारच कमी प्रमाणात अर्ज आले आहेत. दरवर्षी पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश अर्ज करण्यासाठी महिनाभराची मुदत दिली जाते. 16 एप्रिलला प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे आणखी मुदतवाढ दिली जाणार असल्याचे गोसावी यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत सुमारे 1 लाख 87 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज आले असून यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ज्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना शिक्षणाची गरज आहे, असे पालक अमुक एका शाळेचा, माध्यमाचा अट्टहास न धरता आपल्या पाल्याला आरटीई अंतर्गत प्रवेश घेतील, असा विश्वासही गोसावी यांनी व्यक्त केला.

– राज्यातील लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा 20 मे रोजी पूर्ण होत आहे. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवडय़ात म्हणजेच 4 जूनपर्यंत निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या निकालाची प्रक्रिया मे महिन्यातच आटोपण्याचा राज्य शिक्षण मंडळाचा प्रयत्न आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;