केंद्रात पुढील सरकार आपच्या पाठिंब्याने बनणार; भगवंत मान यांचा दावा

केंद्रात पुढील सरकार आपच्या पाठिंब्याने बनणार; भगवंत मान यांचा दावा

केंद्रात पुढील सरकार आपच्या पाठिंब्यानेच बनणार, असा दावा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकांचे दोन टप्प्यातील मतदान झाले आहे. या दोन टप्प्यात 190 जागांवर मतदान झाले आहे. त्यात इंडिया आघाडी 120 ते 125 जागा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच निवडणुकानंतर केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होईल आणि आपचा त्याला पाठिंबा असेल, असेही मान यांनी स्पष्ट केला.

आपण मंगळवारी आपचे प्रमुख केजरीवाल यांची भेट घेणार आहोत. केंद्रात पुढील सरकार आपच्या पाठिंब्यानेच बनणार असून त्यात आम्ही महत्त्वाचा घटक असणार आहोत, असेही मान म्हणाले. आपचा इंडिया आघाडीचा घटक आहे. मात्र, पंजाबमध्ये आप स्वतंत्रपणे लढत आहे. पंजाबमध्ये 13 जागांवर भाजपला उमेदवार मिळत नसल्याचेही मान म्हणाले. त्यांचा पराभव निश्चित असल्याने कोणीही उमेदवारीसाठी पुढे येत नसल्याचे मान म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;