आरटीई प्रवेश अर्ज करण्यास उरले फक्त दोन दिवस

आरटीई प्रवेश अर्ज करण्यास उरले  फक्त दोन दिवस

आरटीईअंतर्गत शाळांमधील 25 टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यास शेवटचे दोन दिवस उरले आहेत. राज्यात आरटीई प्रवेशाच्या तब्बल 8 लाख 86 हजार 411 जागा असून या जागांसाठी आतापर्यंत केवळ 43 हजार 783 विद्यार्थ्यांचेच अर्ज आले आहेत. प्रवेश अर्ज करण्याची मुदत 30 एप्रिलला संपणार असून अखेरच्या दिवसापर्यंत प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांची संख्या वाढेल का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

आरटीईअंतर्गत महानगरपालिका, सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये 25 टक्के आरक्षित जागांसाठीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस 16 एप्रिलपासून सुरुवात झाली. मागील 12 दिवसांत राज्यातील किमान लाखभर विद्यार्थ्यांचादेखील प्रवेश अर्ज भरण्याकडे कल दिसलेला नाही. प्रवेश अर्ज करण्याची मुदत 30 एप्रिलला संपत असून दिलेल्या मुदतीत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.

या सहा जिह्यांतून सर्वाधिक प्रवेश अर्ज

पुणे                       –        12, 640

नागपूर                  –        6002

ठाणे                      –        3214

नाशिक                  –        3205

संभाजीनगर           –        2531

नगर                     –        1877

मुंबई                     –        1726

आरटीई प्रवेशासाठी मुंबई विभागातील उपलब्ध जागा

एकूण शाळा           –        1383

महापालिका           –        877

खासगी                  –        506

एकूण प्रवेश क्षमता           –        29,752

इयत्ता पहिली          –        29,014

पूर्व प्राथमिक          –        738

(एकूण 1383 शाळांपैकी 1319 शाळा या महापालिका शिक्षण विभागाच्या देखरेखीखाली, तर 64 शाळा या शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या अखत्यारीत येतात.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;