गुजरातचा आज उत्साह वाढलेल्या ‘आरसीबी’शी सामना

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

संपूर्ण बदलाची आवश्यकता असलेला गुजरात जायंट्स आज रविवारी येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरशी भिडणार असून आरसीबीची मधली फळी नुकतीच फॉर्मात आलेली असल्याने त्यापासून त्यांना सावध राहावे लागेल. गुजरात आता नऊ सामन्यांतून आठ गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे आणि आठ गुण झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सना मागे टाकण्याच्या दृष्टीने त्यांना विजय आवश्यक आहे.

गुजरातच्या वेगवान गोलंदाजांची प्रभावी कामगिरी करण्याची गरज आहे. या संपूर्ण आयपीएलमध्ये त्यांची वेगवान गोलंदाजी हवी तितकी धारदार राहिलेली नाही. मोहित शर्मा (10 बळी), उमेश यादव (7 बळी), संदीप वॉरियर (5 बळी) यांनी भरपूर धावा दिल्या आहेत, तर स्पेन्सर जॉन्सन आणि अजमतुल्ला ओमरझाई यांनी देखील फारसा आत्मविश्वास वाढवलेला नाही. त्यांचे फिरकी गोलंदाज रशिद खान (8 बळी), आर. साई किशोर आणि नूर अहमद (प्रत्येकी 6 बळी) यांनी नेत्रदीपक कामगिरी केलेली नसली, तरी त्यांची कामगिरी स्थिर राहिलेली आहे.

रजत पाटीदार आणि कॅमेरून ग्रीन यांचा समावेश असलेल्या मधल्या फळीला सूर सापडल्याने आरसीबीला आशेचा नवा किरण सापडला असून हे लक्षात घेता गुजरातच्या फिरकी त्रिकुटासमोरील आव्हान आणखी कठीण होईल. मात्र येथे दवाचा फारसा त्रास होणार नसून ही बाब त्यांना दिलासादायक ठरेल. पाटीदारने केकेआरविरुद्ध 23 चेंडूंत काढलेल्या 52 धावांनी आरसीबीला विजयाच्या जवळ आणले होते, तर हैदराबादविरुद्ध त्याच्या 20 चेंडूंतील 50 धावांनी विजय मिळवून दिला. तो गुजरातच्या फिरकीपटूंविऊद्ध असाच प्रभाव पाडण्यास उत्सुक असेल.

सनरायझर्सविऊद्ध 20 चेंडूंमध्ये 37 धावा करताना ग्रीननेही प्रभावी कामगिरी केली. यामुळे आरसीबीचे दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरर यांच्यावरील अवलंबन कमी होण्यास मदत झाली अहे. तसेच सलामीवीर विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांना जवळपास प्रत्येक सामन्यात मोठी खेळी करण्याच्या दबावातून मुक्त केले आहे.

दुसरीकडे, गुजरातच्या साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिल यांनी या आयपीएलमध्ये 300 च्या वर धावा केल्या आहेत, परंतु त्यांची मधली फळी दमदार कामगिरी करू शकलेली नाही. डेव्हिड मिलर (138 धावा), शाहऊख खान (30), विजय शंकर (73) आणि राहुल तेवतिया (153) या खेळाडूंना सातत्य दाखविता आलेले नाही. आरसीबीच्या गोलंदाजांविऊद्ध त्यांच्याकडून मोठया योगदानाची अपेक्षा संघाला असेल. आरसीबीचे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (4-0-20-0) आणि यश दयाल (3-0-18-1) यांनी सनरायझर्सविरुद्ध चांगली गोलंदाजी केली. त्यांचा लेगस्पिनर कर्ण शर्मा आणि मध्यमगती गोलंदाज ग्रीन यांनीही प्रमुख गोलंदाजांना साथ देताना प्रत्येकी 4 बळी घेतले आहेत. मात्र आरसीबीची गोलंदाजी हा कमकुवत दुवा राहिलेला आहे.

सामन्याची वेळ : दुपारी 3.30 वा.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;