मागच्या जन्मात मी बंगालमध्ये जन्मलो असेल… पंतप्रधान नरेंद्र मोदी असं का म्हणाले?

मागच्या जन्मात मी बंगालमध्ये जन्मलो असेल… पंतप्रधान नरेंद्र मोदी असं का म्हणाले?

देशभरात आज दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. तर तिसऱ्या टप्प्याचा प्रचार जोरदार सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी तिसऱ्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार सुरू केला आहे. आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमध्ये होते. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली. ही टीका करतानाच मागच्या जन्मात आपण पश्चिम बंगालमध्ये जन्मलो होतो, असं मला वाटतंय, असं भावनिक उद्गारही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढलं. मोदी यांच्या या विधानाचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या मालदा उत्तर लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी टीएमसीवर हल्ला चढवला. एकेकाळी पश्चिम बंगाल संपूर्ण देशाच्या विकासाचं नेतृत्व करत होता. परंतु, आधी डाव्यांनी आणि आता टीएमसीने बंगालच्या महानतेला नख लावण्याचं काम केलं आहे. बंगालचा स्वाभिमान धुळीस मिळवला आहे. विकासाला ब्रेक दिला आहे. टीएमसीच्या राज्यात फक्त एकच गोष्ट चालते. ती म्हणजे हजारो कोटींचे घोटाले. घोटाळे टीएमसी करते आणि त्यांची झळ बंगालच्या जनतेला सोसावी लागते, असा हल्लाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चढवला.

ते पैशाची लूट करतात

मोदी केवळ टीएमसीवर टीका करून थांबले नाहीत तर बंगालच्या जनतेला भावनिक आवाहनही केलं. तुमचं एवढं प्रेम पाहून मी मागच्या जन्मात पश्चिम बंगालमध्ये जन्मलो असलो पाहिजे, असं वाटतं. पुढच्या जन्मात मी बंगालमधील एखाद्या मातेच्या पोटीच जन्म घेईल, असं मोदी म्हणाले. बंगालमधील 50 लाखहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान योजनेतील 8 हजार कोटी थेट पाठवले आहेत. पण टीएमसी सरकार पाहा, लूटमार करण्याची एकही संधी सोडत नाही. मी केंद्रातून बंगालच्या विकासासाठी इथल्या सरकारकडे पैसे पाठवतो. पण टीएमसी नेते आणि मंत्री या पैशाची लूट करतात, असा आरोप मोदी यांनी केला.

महिलांवर सर्वाधिक अत्याचार

टीएमसी मां, माटी आणि मानुषचं नाव घेऊन सत्तेत आली. पण या सरकारने सर्वाधिक विश्वासघात महिलांचा केला आहे. तर भाजपने मुस्लिम महिलांना तीन तलाकपासून संरक्षण दिलं. तो कायदाच रद्द केला. टीएमसीने त्यालाही विरोध केला होता. संदेशखालीत महिलांवर अत्याचार झाले. टीएमसी सरकार शेवटपर्यंत मुख्य आरोपीला वाचवत राहिली, असंही मोदी म्हणाले.

काँग्रेस-टीएमसीत तुष्टीकरणाची स्पर्धा

तुष्टीकरण हेच काँग्रेस आणि टीएमसीचं काम आहे. तुष्टीकरणासाठी (लांगूलचालन) हे दोन्ही पक्ष काहीही करू शकतात. त्यासाठी हे लोक देशाहिताचे निर्णयही बदलू शकतात. यांच्यात तुष्टीकरणाची स्पर्धाच लागली आहे. टीएमसी सरकार बांगलादेशी घुसखोरांना राज्यात थारा देत आहे. हे घुसखोर तुमच्या जमिनी आणि शेतीवर कब्जा करत आहेत. तर काँग्रेस तुमची संपत्ती व्होट बँकमध्ये विभागत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;