मागच्या जन्मात मी बंगालमध्ये जन्मलो असेल… पंतप्रधान नरेंद्र मोदी असं का म्हणाले?

मागच्या जन्मात मी बंगालमध्ये जन्मलो असेल… पंतप्रधान नरेंद्र मोदी असं का म्हणाले?

देशभरात आज दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. तर तिसऱ्या टप्प्याचा प्रचार जोरदार सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी तिसऱ्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार सुरू केला आहे. आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमध्ये होते. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली. ही टीका करतानाच मागच्या जन्मात आपण पश्चिम बंगालमध्ये जन्मलो होतो, असं मला वाटतंय, असं भावनिक उद्गारही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढलं. मोदी यांच्या या विधानाचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या मालदा उत्तर लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी टीएमसीवर हल्ला चढवला. एकेकाळी पश्चिम बंगाल संपूर्ण देशाच्या विकासाचं नेतृत्व करत होता. परंतु, आधी डाव्यांनी आणि आता टीएमसीने बंगालच्या महानतेला नख लावण्याचं काम केलं आहे. बंगालचा स्वाभिमान धुळीस मिळवला आहे. विकासाला ब्रेक दिला आहे. टीएमसीच्या राज्यात फक्त एकच गोष्ट चालते. ती म्हणजे हजारो कोटींचे घोटाले. घोटाळे टीएमसी करते आणि त्यांची झळ बंगालच्या जनतेला सोसावी लागते, असा हल्लाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चढवला.

ते पैशाची लूट करतात

मोदी केवळ टीएमसीवर टीका करून थांबले नाहीत तर बंगालच्या जनतेला भावनिक आवाहनही केलं. तुमचं एवढं प्रेम पाहून मी मागच्या जन्मात पश्चिम बंगालमध्ये जन्मलो असलो पाहिजे, असं वाटतं. पुढच्या जन्मात मी बंगालमधील एखाद्या मातेच्या पोटीच जन्म घेईल, असं मोदी म्हणाले. बंगालमधील 50 लाखहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान योजनेतील 8 हजार कोटी थेट पाठवले आहेत. पण टीएमसी सरकार पाहा, लूटमार करण्याची एकही संधी सोडत नाही. मी केंद्रातून बंगालच्या विकासासाठी इथल्या सरकारकडे पैसे पाठवतो. पण टीएमसी नेते आणि मंत्री या पैशाची लूट करतात, असा आरोप मोदी यांनी केला.

महिलांवर सर्वाधिक अत्याचार

टीएमसी मां, माटी आणि मानुषचं नाव घेऊन सत्तेत आली. पण या सरकारने सर्वाधिक विश्वासघात महिलांचा केला आहे. तर भाजपने मुस्लिम महिलांना तीन तलाकपासून संरक्षण दिलं. तो कायदाच रद्द केला. टीएमसीने त्यालाही विरोध केला होता. संदेशखालीत महिलांवर अत्याचार झाले. टीएमसी सरकार शेवटपर्यंत मुख्य आरोपीला वाचवत राहिली, असंही मोदी म्हणाले.

काँग्रेस-टीएमसीत तुष्टीकरणाची स्पर्धा

तुष्टीकरण हेच काँग्रेस आणि टीएमसीचं काम आहे. तुष्टीकरणासाठी (लांगूलचालन) हे दोन्ही पक्ष काहीही करू शकतात. त्यासाठी हे लोक देशाहिताचे निर्णयही बदलू शकतात. यांच्यात तुष्टीकरणाची स्पर्धाच लागली आहे. टीएमसी सरकार बांगलादेशी घुसखोरांना राज्यात थारा देत आहे. हे घुसखोर तुमच्या जमिनी आणि शेतीवर कब्जा करत आहेत. तर काँग्रेस तुमची संपत्ती व्होट बँकमध्ये विभागत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सांगली मार्केट यार्डात रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ता? महानगरपालिका-बाजार समितीच्या वादात व्यापारी, शेतकऱयांचे हाल सांगली मार्केट यार्डात रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ता? महानगरपालिका-बाजार समितीच्या वादात व्यापारी, शेतकऱयांचे हाल
सांगली मार्केट यार्डातील रस्ता पावसाळ्यापूर्वीच खराब झाला आहे. रस्त्यात खड्डा की खड्डय़ात रस्ता, अशी रस्त्याची दयनीय स्थिती मार्केट यार्ड परिसरात...
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया जुलैमध्ये?
पतसंस्थेची फसवणूक; व्यापाऱयाला सक्तमजुरीची शिक्षा, चार लाखांचा दंड
गणेशमूर्ती करणाऱ्या 130 कारखान्यांना नोटिसा, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नगर महापालिकेची मोहीम
नोकरदारांना दिलेल्या कर्जाचे 28 कोटी थकले, वसुलीसाठी सांगली जिल्हा बँकेची विशेष मोहीम
एमसीए प्रेसिडेंट चषक; माटुंगा जिमखान्याला सी आणि डी डिव्हिजनचे जेतेपद
महाबळेश्वरमध्ये आलेल्या पर्यटकांना असुविधांचा फटका, वेण्णालेक ते महाडनाका दरम्यानच्या फुटपाथची दुरवस्था