धार्मिक वास्तू उभारण्यासाठी देणगी देत नाही; विद्या बालनने सांगितलं कारण

धार्मिक वास्तू उभारण्यासाठी देणगी देत नाही; विद्या बालनने सांगितलं कारण

धर्माच्या बाबतीत भारतीयाचं अधिकाधिक ध्रुवीकरण झालं असून लोक आता अशा कोणत्याही गोष्टीच्या शोधात आहेत, ज्यामुळे त्यांना ओळख प्राप्त होईल, असं मत अभिनेत्री विद्या बालनने मांडलं आहे. या देशाची आधी धार्मिक ओळख नव्हती, पण आता परिस्थिती बदलली आहे, असंही ती म्हणाली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विद्या विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाली. धर्माच्या बाबतीत देशात ध्रुवीकरण वाढलंय, असं तुला वाटतं का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर विद्याने तिचं स्पष्ट मत मांडलं.

‘अनफिल्टर्ड बाय समदिश’ला दिलेल्या मुलाखतीत विद्या म्हणाली, “माझ्या मते नक्कीच आपण विभागलो गेलोय. एक राष्ट्र म्हणून आधी आपली धार्मिक ओळख नव्हती. पण आता माहित नाही का.. हे फक्त राजकारणामुळे नाही, सोशल मीडियामुळेही झालंय. कारण आपण सर्वजण या जगात हरवलोय आणि स्वत:ला शोधतोय. खरंतर आपली स्वत:ची अशी ओळख नाहीच. त्यामुळे स्वत:ला जोडण्यासाठी आपण अशा गोष्टींच्या शोधात आहोत. म्हणून असं सर्वकाही झालंय. मग ते धर्म असो किंवा आता डोळे उघडलेले असो. मी हा आहे, मी तो आहे असं लोक म्हणतात. पण तुम्ही नेमकं कोण आहात, हे तुम्हालाही माहित नाही. म्हणूनच तुम्ही अशा गोष्टींकडे झुकताय किंवा जाताय. आपल्या सर्वांना आपलेपणाची भावना खूप गरजेची आहे आणि या जगात सोशल मीडियाच्या प्रसारामुळे आपण आधीपेक्षा जास्त एकटे झालो आहोत. म्हणून वरवरच्या पातळीवर आपण कल्पना आणि संकल्पनांशी सोयीस्करपणे स्वत:ला जोडत आहोत. आज जगाचं ध्रुवीकरण झालं आहे, हे फक्त एका देशापुरतं मर्यादित नाही.”

या मुलाखतीत विद्याने हेसुद्धा स्पष्ट केलं की ती धार्मिक बांधकामांसाठी कधीच दान करत नाही. धार्मिक बांधकामासाठी निधीची मागणी करणाऱ्यांना ती कधीच देणगी देत नाही. याबद्दल बोलताना ती म्हणाली, “त्यापेक्षा मी आरोग्यसेवा, स्वच्छा आणि शिक्षण या क्षेत्रांसाठी निधी देईन. मी स्वत: खूप धार्मिक आहे, मी दररोज पूजा करते. पण मला धार्मिक बांधकामासाठी देणगी द्यावंसं वाटत नाही.”

जेव्हा विद्याला विचारलं गेलं की तिला परोपकारासाठी कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडेल? त्यावर तिने सांगितलं, “आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण. जर एखादी व्यक्ती माझ्याकडे धार्मिक वास्तू उभारण्यासाठी देणगी मागत असेल, मग ती कोणतीही वास्तू असो.. मी कधीच त्यांना देणगी देत नाही. मी त्यांना म्हणते, जर तुम्ही हॉस्पिटल, शाळा किंवा शौचालय बांधत असाल तर मी आनंदाने योगदान देईन. पण धार्मिक संस्थांना नाही.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;