मतदार ‘इंडिया’सोबत, महाराष्ट्रात 35हून अधिक जागा जिंकू; माणिकराव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

मतदार ‘इंडिया’सोबत, महाराष्ट्रात 35हून अधिक जागा जिंकू; माणिकराव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

>> प्रसाद नायगावकर

लोकशाहीचा उत्सव सुरू असून लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रातील 8 जागांसह देशभरात 88 मतदारसंघात मतदान सुरू आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनीही सुपुत्र राहुल ठाकरे याच्यासह यवतमाळ जिल्ह्यातील त्यांच्या जन्मगावी हरू येथे मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर बोलताना माणिकराव ठाकरे यांनी मतदार इंडिया आघाडीसोबत असून महाराष्ट्रात 35 अधिक जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला.

भारतीय जनता पक्षाकडून संविधानिक संस्था नेस्तनाबूत करण्याचे काम सुरू आहे. ग्रामीण भागात आणि तरुणांमध्ये बेरोजगारीमुळे मोदी सरकारविरोधात रोष आहे. यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असून ते समाजामध्ये वाद निर्माण करण्याचे काम करत आहेत. पंतप्रधानपद हे देशाचे असते, मात्र मोदी हिंदू-मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण होतील अशी विधाने करत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केली.

शेतीसाठी आवश्यक गोष्टींच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. शेतीमालालाही भाव नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे, असेही ते म्हणाले. तसेच भाजपकडून सरकारी कंपन्या आणि संस्था विकण्याचा धडाका सुरू आहेत. देशातील महिला सुरक्षित नाही, याचा परिणाम या निवडणुकीत दिसेल, असा ठाम दावाही त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये सर्वांमध्ये एकाप्याचे चित्र आहे. यामुळे महाराष्ट्रात आघाडीला 35हून अधिक जागा मिळतील.

दरम्यान, काँग्रेसने माणिकराव ठाकरे यांना तेलंगणा विधानसभा निवडणुकीकरिता प्रभारी बनविले होते. तेलंगणामध्ये काँग्रेसने 119 पैकी 64 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले. केसीआर यांनी पुन्हा सत्तेत येण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली, मात्र तेलंगणामध्ये काँग्रेस सरस ठरली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;