नगर शहरात पाणी नसल्याने नागरिक आक्रमक, नगरपरिषद कार्यालयासमोर घागरफोड आंदोलन

नगर शहरात पाणी नसल्याने नागरिक आक्रमक, नगरपरिषद कार्यालयासमोर घागरफोड आंदोलन

शहरातील आदर्शनगर भागाला नगरपरिषदे कडून चार महिन्यांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने येथील नागरिकांनी आक्रमक होत नगरपरिषदेचा निषेध म्हणून नगरपरिषद कार्यालयासमोर घागर फोड आंदोलन केले. सध्या पाण्याची तीव्रतांचाई सुरू असून पाण्यासाठी या भागातील नागरिकांना मोठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार आदर्शनगर येथील रहिवाशांनी पाण्याबाबत तक्रारी करून सुद्धा पाणी मिळत नसल्याने गुरुवारी दुपारी या भागातील नागरिकांनी नगरपरिषदेसमोर घागर फोडून अनोखे आंदोलन केले.

गेली चार महिन्यापासून या भागाला पाणी मिळत नाही. पाणीपट्टी घरपट्टी हे नियमित चालू आहे. सध्या आम्हाला पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहे. पाणी येत नसल्याने जानेवारी महिन्यापासून या भागातील पिण्याचे पाण्याचे टँकर सुमारे एक हजार ते दीड हजार रुपये इतक्या दराने विकत घेण्याची वेळ नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे आली आहे. मोठा आर्थिक भुर्दंड नागरिकांना पडत आहे. याची जाणीव नगरपरिषद पाणी पुरवठा विभाग घेत नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही पाण्याचा प्रश्न सातत्य पूर्णपणे नगरपरिषदेकडे मांडत आलो. मात्र फक्त उडवाउडवीचे उत्तर नगरपरिषदेकडून देण्यात आले सध्या पाण्याचा शहराचा तालुक्यात मोठ्या प्रमाणात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात हा प्रश्न हाताळण्यास पालिका प्रशासन निष्क्रिय ठरत आहे.

लोकांच्या पाण्याचे प्रश्नांची काळजी नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी घेत नाही.आदर्श नगर येथील लोक पाण्याचा प्रश्न घेऊन नगरपरिषद कार्यालयात आली की, तेवढ्या पुरते वेळ काढून वेळ मारून घेऊन जाण्याचे काम आतापर्यंत झाले आहे. उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न उद्भवणार होता त्यापूर्वीच नगरपरिषदने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या नाही असाही आरोप नागरिकांनी यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्या बरोबर झालेल्या चर्चा दरम्यान केला आहे. मुख्याधिकारी लांडगे यांनी लेखी आश्वासन देऊन आपला पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;