भाजपच्या पथ्यावर पडणारे मत विभाजन बौद्ध समाजाने टाळावे! पँथर-रिपब्लिकन नेते श्यामदादा गायकवाड यांचे आवाहन

भाजपच्या पथ्यावर पडणारे मत विभाजन बौद्ध समाजाने टाळावे! पँथर-रिपब्लिकन नेते श्यामदादा गायकवाड यांचे आवाहन

कुठलाही आंबेडकरवादी, बहुजनवादी पक्ष राज्यात स्वबळावर जिंकणे आणि मोदी आणि भाजपला एकटय़ाने पराभूत करू शकत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत बौद्ध समाजाने भाजपच्या पथ्यावर पडणारे आपल्या निर्णायक मतांचे विभाजन टाळावे आणि महाविकास आघाडीच्या प्रबळ उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन ज्येष्ठ पँथर-रिपब्लिकन नेते श्यामदादा गायकवाड यांनी केले.

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत गायकवाड बोलत होते. लोकसभा निवडणुकीत देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवण्याचे मोठे आव्हान समोर उभे ठाकले आहे. मोदी आणि भाजपला रोखणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन गायकवाड यांनी केले. यावेळी ज्येष्ठ पँथर नेते सयाजी वाघमारे, माजी आयपीएस अधिकारी सुधाकर सुराडकर, संजय अपरांती, ज्येष्ठ पत्रकार सुनील खोब्रागडे उपस्थित होते.

बौद्ध समाजाच्या एकजुटीच्या निर्णायक मतांची ताकद ही नव्याने दाखवण्याची गोष्ट राहिलेली नाही. आंबेडकरी समाजाने आपल्या मतांची उपयुक्तता आजवर अनेकदा सिद्ध केले आहे. आपल्या मतांची विभागणी टाळून आंबेडकरी समाज घडवेल आणि भाजपला रोखेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

गटातटापेक्षा लोकशाही मोठी
काही आंबेडकरवादी, बहुजनवादी गट-संघटनांनी केवळ पक्षीय अस्तित्वासाठी या निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यांनी संविधान आणि लोकशाहीच्या अस्तित्वाला प्राधान्य देऊन माघार घ्यावी, असे आवाहन मान्यवरांनी केले.

विदर्भातील 80 संघटनांचा पाठिंबाविदर्भातील पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी आंबेडकरी समाजाची भाजपच्या पथ्यावर पडणारी मतविभागणी टाळण्यासाठी थोर विचारवंत डॉ. यशवंत मनोहर, डॉ. सुखदेव थोरात यांच्या नेतृत्वाखाली 80 संघटनांनी जनजागृती केली होती. त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला असून भाजपच्या पराभवासाठी राज्यभरात हे काम आंबेडकरी कार्यकर्त्यांनी सर्वत्र जोरात सुरू केले आहे, असे गायकवाड म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE: राज्यात मतदानासाठी सकाळीच लागल्या रांगा Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE: राज्यात मतदानासाठी सकाळीच लागल्या रांगा
लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. देशभरात ४९ जागांवर मतदान होणार आहे. देशभरात 695 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे....
गॅस रिफिलिंग करताना कंटेनरचा भीषण स्फोट 4 कंटेनर जळून खाक; 15 घरांचे नुकसान
75 वर्षीय आजोबांना हायकोर्टाचा दिलासा; तीन मुलांना झोपड्यातून आठ आठवड्यात बाहेर जाण्याचे आदेश
राज्यातून भाजप, मित्रमंडळींचा सुपडा साफ होणार! – नाना पटोले
84 वर्षीय वडिलांचा पालक होण्यासाठी मुलगी हायकोर्टात
आचारसंहितेची ऐशी की तैशी; मतदानाच्या आदल्या दिवशीही भाजपकडून प्रचार, आदित्य ठाकरे यांची कारवाईची मागणी
शेवटच्या टप्प्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज; मुंबईतील 6 जागांवर आज मतदान, 124 संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त