ICC T20 World Cup 2024 – ‘या’ जोडीला सलामीला उतरवा; सौरव गांगुलीचा सल्ला

ICC T20 World Cup 2024 – ‘या’ जोडीला सलामीला उतरवा; सौरव गांगुलीचा सल्ला

सध्या आयपीएल सामन्यांचे धूमशान सुरू आहे. आयपीएल सामने संपल्यानंतर आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेचा थरार 1 जूनपासून सुरू होणार आहे. अमेरिका आणि कॅनडा यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. तर टिम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे. टिम इंडियाचा दुसरा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. याची सर्व क्रिकेट रसिकांमध्ये उत्कंठा आहे. या विश्वचषक सामन्यासाठी टिम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी संघाला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

टिम इंडियाच्या खेळाडूंनी कोणत्याही जडपण, दबावाशिवाय निर्भयपणे खेळणे गरजेचे आहे. टिम इंडियाच्या खेळाडूंनी देशाबाहेर आक्रमक खेळ करणे महत्त्वाचे आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या हे सर्व प्रतिभावान खेळाडू आहेत. त्यांची षटकार मारण्याची क्षमता जबरदस्त आहे. संघ निवडताना संतुलन राखणे महत्त्वाचे असल्याचे गांगुली यांनी सांगितले. या निवडलेल्या संघात संतुलन आणि समन्वय असणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-20 विश्वचषकात सलामीला खेळायला हवे. विराटमध्ये 40 चेंडूत शतक झळकावण्याची क्षमता आहे. रोहितही आक्रमक फलंदाजी करतो. टी-20 मध्ये वय किंवा तरुण असणे गरजेचे नाही. या सामन्यांसाठी आक्रमक खेळ गरजेचा आहे. महेंद्रसिंग धोनी अजूनही खणखणीत षटकार मारतो आणि अजूनही संघासाठी मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी सलामीच्या जोडीचे नाव सांगत सौरव यांनी टिम इंडियाला मोलाचा सल्ला दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;