कोविडमध्ये राहुल नार्वेकर अलिबागच्या बंगल्यात लपून होते, आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

कोविडमध्ये राहुल नार्वेकर अलिबागच्या बंगल्यात लपून होते, आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

शिवसेना कोविड काळात नागरिकांच्या मदतीसाठी रात्रंदिवस काम करत होती. मुंबईने संपूर्ण देशच नव्हे तर जगाला आदर्श दिला. जगाने गौरवलेला कोविडमुक्ती पॅटर्न राबवणारे तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात शिवसैनिक रस्त्यावर उतरून काम करत होते. त्यावेळी कुलाब्यातील आमदार राहुल नार्वेकर मात्र कुटुंबीयांसह अलिबागच्या बंगल्यात लपून होते, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी आज चढवला.

आदित्य ठाकरे यांचा संपूर्ण महाराष्ट्रात ‘शाखासंवाद’ दौऱयांचा झंझावात सुरू आहे. आज कुलाब्यामधील गीता नगर येथे या दौऱयाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार अरविंद सावंत हेसुद्धा उपस्थित होते. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

गीता नगरची जनता अरविंद सावंत यांच्यासोबत असल्याचा विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. कुलाब्यातील वॉटर माफिया राज अरविंद सावंत यांनी मोडून काढला आणि इथे विकासगंगा आणली. म्हणून गीता नगरची जनता अरविंद सावंत यांच्यासोबतच राहणार, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

याप्रसंगी शिवसेना उपनेते राजकुमार बाफना, अरविंद नेरकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक सुधीर साळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपाने जनतेची दिशाभूल करताना निवडणुकीत अनेक स्वप्ने सर्वसामान्यांना दाखवली होती, मात्र प्रत्यक्षात स्थिती कायम उलट राहिली, असे सांगत भाजपच्या फसव्या धोरणांचा आदित्य ठाकरे यांनी बुरखा फाडला. ‘2014 मध्ये वचने दिली ती पूर्ण झाली का? खात्यात 15 लाख रुपये आले का? महागाई कमी झाली का? गॅस सिलिंडर स्वस्त झाला का? पेट्रोल-डिझेल यांच्या आधी किमती काय होत्या आणि आता काय आहेत? विकसित भारताची जी स्वप्नं दाखवली ती पूर्ण झाली का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. काळा पैसा परत आणणार असे भाजपवाले म्हणाले, काळा पैसा माहीत नाही, पण यांचा इलेक्ट्रोरोल बॉण्डचा घोटाळा मात्र बाहेर आला, अशी मिश्कील टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

400 पार फक्त संविधान बदलण्यासाठी

भाजपच्या 400 पारच्या नाऱयावर आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ‘जनतेने आता कोणत्या दिशेने मतदान करायचे हे ठरवले पाहिजे. तुमच्या हातात जो मतदानाचा अधिकार आहे तो राहणार की नाही हे आता ठरणार आहे. भाजपच्या अनेक जणांकडून सांगितले जातेय की, आम्हाला चारशे पार करायचे आहे. कारण त्यांना संविधान बदलायचे आहे. हे तुम्हाला मान्य आहे का?’ असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;