…तर इलेक्टोरल बाँड रद्द का करावे लागले? राहुल गांधी यांचा भाजपला सवाल

…तर इलेक्टोरल बाँड रद्द का करावे लागले? राहुल गांधी यांचा भाजपला सवाल

देशात होत असलेल्या लोकसभा निवडणुका खूप महत्त्वाच्या आहेत. देशातील लोकशाही आणि संविधान रक्षणासासाठी या निवडणुकीला महत्त्व आले आहे. ही निवडणूक विचारधारेची आहे. भाजपचा संविधान संपवण्याचा डाव आहे. त्यामुळे लोकशाही आणि संविधान वाचवण्याची ही निवडणूक असून इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्ष लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून हल्ला चढवला.

पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराचे चॅम्पियन आहेत. इलेक्टोरल बाँड आतापर्यंतचा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे. हे बाँड योग्य होते, असे मोदी सांगत आहेत, तर मग सर्वोच्च न्यायालयाला हे बाँड रद्द का करावे लागले. या बाँडद्वारे झालेला घोटाळा आणि भ्रष्टाचार जनतेसमोर आला आहे. जनतेत भाजपविरोधात रोष आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला केवळ 150 जागा मिळतील, असा दावाही राहुल गांधी यांनी केला आहे.

या निवडणुकीत बेरोजगारी, महागाई हे सर्वात मोठे मुद्दे आहेत. मात्र, भाजप किंवा पंतप्रधान या मुद्द्यावर बोलतच नाही. जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी ते वेगळेच मुद्दे उपस्थित करत देशात द्वेष पसरवत आहेत. जनमताचा कौल आता इंडिया आघाडीच्या बाजूने आहे. काही दिवसांपूर्वी आपल्याला वाटत होते की, भाजप 180 जागा जिंकेल. पमात्र, आता भाजपला 150 जागा जिंकणेही कठीण असल्याचे दिसत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

भाजपने खोटी आश्वासने देत सत्ता मिळवली. 10 वर्षात जनतेची धूळफेक केली. त्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण झालेली नाही. त्या फक्त फोल घोषणाच ठरल्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही.तरुणांना रोजगार मिळाला नाही, शहरांचा विकास झाला नाही. या काळात फक्त भाजपच्या मित्रांचा विकास झाला. इलेक्टोरल बॉन्डद्वारे भाजपने केलेला भ्रष्टाचार उघड झाला आहे. सर्व भ्रष्टाचाऱ्यांसाठी भाजप हे आश्रयस्थान बनले आहे, अशा शब्दांत अखिलेश यादव यांनी भाजपवर हल्ला चढवला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;