बोरवडेत कालव्यावरील 30 वर्षांपूर्वीचा पूल कोसळला; मोठी दुर्घटना टळली

बोरवडेत कालव्यावरील 30 वर्षांपूर्वीचा पूल कोसळला; मोठी दुर्घटना टळली

कोल्हापूर जिह्याची भाग्यदायिनी असलेल्या काळम्मावाडी धरणाच्या कागल तालुक्यातील निढोरी शाखेच्या बोरवडे फाटा येथील उजव्या कालव्यावरील 30 वर्षे जुना असलेला वाहतूक पूल कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्यावरील हा पूल 30 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. दोन वर्षांपासून पुलाच्या पिलरचे दगड कोसळू लागल्याने हा पूल वाहतुकीस धोकादायक बनला होता. याबाबत शेतकऱ्यांनी तोंडी व लेखी स्वरूपात मागणी करूनही संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्यानेच हा पूल रविवारी सकाळी ढासळला.

पूल कोसळण्याच्या जेमतेम पाच मिनिटे आधी पंधरा महिलांना घेऊन जाणारा एक ट्रक्टर या पुलावरून गेला होता, तर दुसरा रिकामा ट्रक्टर पलीकडे जात असताना पूल कोसळल्याने तो कालव्यात कोसळला. गावकऱ्यांच्या मदतीने कालव्यात अडकलेला ट्रक्टर बाहेर काढण्यात आला. सुदैवाने महिलांनी भरलेला ट्रक्टर जात असताना पूल कोसळला असता, तर मोठी जीवितहानी झाली असती, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

बोरवडेजवळील शेतीतून काळम्मावाडीचा उजवा कालवा गेला आहे. शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी येथे 30 वर्षांपूर्वी पूल उभारण्यात आला होता. या भागात परिसरातील शेकडो एकर शेती असल्याने शेतकऱ्यांना या पुलावरूनच वाहतूक करावी लागते. कालव्याच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात उसाच्या शेतीचे क्षेत्र आहे. त्यामुळे गळीत हंगामात या पुलावरून उसाची वाहतूक सुरू असते.

सिंचनावर कोणताही परिणाम नाही
कालव्याचा पूल कोसळल्यामुळे सिंचनावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना पर्यायी बाजूच्या पुलाचा वापर करण्यास सांगणार आहोत. याबाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवून लवकरात लवकर नवीन पूल उभारण्यासाठी प्रयत्न करू, असे दूधगंगा कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक पवार यांनी सांगितले.

दोन वर्षांपासून पूल धोकादायक बनला होता
दोन वर्षांपासून या पुलाच्या पिलरचे दगड निखळून पडल्याने पुलाला धोका निर्माण झाला होता. याबाबत लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी येथे नवीन पूल उभारण्याची मागणी केली होती. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने या परिणती पूल पडण्यामध्ये झाली. आता या परिसरातील शेतकऱ्यांना मुदाळ तिट्टा येथील पुलावरून ये-जा करावी लागणार असल्याने त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागणार आहे. दुर्घटनास्थळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज फराकटे, बोरवडेचे उपसरपंच विनोद वारके, ग्रा.पं. सदस्य राजाभाऊ चव्हाण, केदार फराकटे यांनी भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी नवीन पूल तत्काळ उभारावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;