भाजपच्या मनात नेमके काय चाललेय; जितेंद्र आव्हाड यांचा मोठा दावा

भाजपच्या मनात नेमके काय चाललेय; जितेंद्र आव्हाड यांचा मोठा दावा

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झडत आहेत. देशात आणि राज्यात भाजपच्या हुकूमशाहीविरोधात अनेक पक्ष एकवटले आहे. तसेच भाजपच्या अनेक नेत्यांकडून संविधान बदलण्यासाठी पक्षाला बहुमत द्या, अशी वक्तव्ये करण्यात येत आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे. तसेच भाजपच्या मनात नेमके काय चालले आहे, याबाबत त्यांनी मोठा दावाही केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर याबाबत एक पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, आतापर्यंत भाजपच्या पाच उमेदवारांनी आपल्या प्रचार करताना, ‘आम्हाला संविधान बदलण्यासाठी जास्त जागांवर विजयी करा,’ असे म्हटले आहे. म्हणजेच, यांच्या मनात काय आहे हे स्पष्ट होत आहे. यांना 400 जागा याचसाठी हव्या आहेत की, यांना संविधान बदलायचे आहे, आम्हीही तेच म्हणत आहोत. बुरसटलेल्या विचारांचे हे मनुवादी भारताला आजही पाच हजार वर्ष मागे घेऊ जाऊ इच्छितात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे पती परकाला प्रभाकर यांनी आपल्या मुलाखतीत बरोबर सांगितले आहे की, “प्राचीन भारतात घेऊन जाणारा हा सत्ताधारी पक्ष आहे.” भाजपच्या प्रमुख मंत्र्यांचे पती जेव्हा अशी वाक्ये बोलतात; तेव्हा खासगीत त्यांची पत्नी त्यांना काहीतरी सांगतच असणार ना! त्यामुळे स्पष्ट होतंय की, संविधान बदलणं ही एकमेव गॅरंटी सध्या दिली जात आहे, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे. भाजपकडून छत्रपती उदयनराजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यावरूनही आव्हाड यांनी टीका केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;