पालघरमध्ये उष्माघाताने विद्यार्थिनीचा बळी

पालघरमध्ये उष्माघाताने विद्यार्थिनीचा बळी

पालघरमध्ये उष्माघाताने पहिला बळी गेला आहे. अश्विनी रावते या 16 वर्षीय विद्यार्थिनीला उष्माघाताने भोवळ आल्याने ती कोसळली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.  ही घटना विक्रमगड तालुक्यातील केव वेडगे पाडा येथे घडली. अश्विनी ही मनोर येथील एस पी मराठी विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत होती. आज दुपारी अकरावीचा पेपर देऊन अश्विनी घरी आली. परंतु घरी कोणीच नसल्याने ती आई वडिलांना शोधण्यासाठी बाहेर पडली. नदीजवळ येताच तिला रणरणत्या उन्हाने भोवळ आली, आणि ती शेतात कोसळली. शेत घरापासून लांब असल्याने आणि उन्हाच्या तडाख्यामुळे दुपारी कोणीच बाहेर पडत नसल्याने अश्र्विनीचा मृतदेह तिथे तब्बल दोन तास पडून होता. आई वडील घरी आले, तेव्हा त्यांना अश्विनी दिसली नाही म्हणून ते तिचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले तेव्हा तिचा मृतदेह नदीजवळील शेतात पडल्याचा  दिसला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;