पारा 40 अंशांवर, तीन दिवस काळजीचे; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

पारा 40 अंशांवर, तीन दिवस काळजीचे; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱया उकाडय़ामुळे नागरिक घामाघूम होत असताना अनेक भागांत पारा अचानक 39 ते 40 अंशांवर पोहोचल्याने मुंबईची अक्षरशः भट्टी झाली. ही स्थिती उद्या 16 एप्रिल रोजीदेखील कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्याने मुंबईचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे पालिकेकडूनही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय पालिका आणि ‘नीरी’च्या माध्यमातून मुंबईतील ‘हॉट’स्पॉट शोधण्याची कार्यवाही सुरू आहे. पुढचे तीन दिवस पारा चढाच राहणार असल्याचे पुणे हवामान खात्याचे वैज्ञानिक डॉ. अनुपम कश्यप यांनी सांगितले.

राज्याला उष्माघाताचा तडाखा

राज्यात वाढलेल्या प्रचंड उकाडय़ामुळे अनेक जिह्यांत उष्माघाताचे रुग्ण आढळत आहेत. गेल्या चार दिवसांपासून उन्हाचा तडाखा आणखी वाढल्याने फक्त चार दिवसांत उष्माघाताचे 36 रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या दीड महिन्यात 77 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मागील वर्षी याच कालावधीमध्ये राज्यात 373 लोकांना उष्माघाताचा त्रास झाला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;