ईडीच्या भीतीने नेते पक्ष सोडताहेत, अशोक गेहलोत यांचा निशाणा

ईडीच्या भीतीने नेते पक्ष सोडताहेत, अशोक गेहलोत यांचा निशाणा

राजस्थानात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहीले आहेत. पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या 12 जागांसाठी मतदान होणार आहे. मात्र, अद्यापी काँग्रेसमधून अनेक नेते भाजपामध्ये उडय़ा घेत आहेत. ईडी आणि सीबीआयच्या भितीनेच हे नेते पक्ष सोडत आहेत. अशा शब्दांत काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी एएनआयशी बोलताना मोदी सरकारवर निशाणा साधला.

ईडी, सीबीआयचा ससेमीरा मागे लावून नेत्यांना तुरुंगात डांबले जात आहे. त्यामुळे काँग्रेसचे पुढे काय होणार अशी भीती अनेक नेत्यांना वाटत असल्याचे गेहलोत म्हणाले. मात्र, आम्ही सत्तेत राहिलो किंवा नसलो तरीही काँग्रेसची जी विचारधारा आहे ती काँग्रेस कधीच सोडणार नाही, असेही ते म्हणाले. देश आणि काँग्रेसचा डीएनए एकच असून शेवटी देशाला काँग्रेसकडेच पहावे लागेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानतंर राजस्थानसह विविध राज्यांमध्ये अनेक काँग्रेस नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. याबाबत गेहलोत यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रीया दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;