60 दिवसांत 427 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले, मिंधे सरकार मात्र निवडणुकांमध्ये मशगूल

60 दिवसांत 427 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले, मिंधे सरकार मात्र निवडणुकांमध्ये मशगूल

भीषण पाणीटंचाईमुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, पण राज्यकर्ते पक्ष पह्डापह्डीच्या राजकारणात आणि आता निवडणूक प्रचारात मशगूल आहेत. सरकारने दुष्काळी परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे राज्यात मागील दोन महिन्यांत 427 शेतकऱयांनी मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक आकडेवारी आहे. गेल्या वर्षी दहा महिन्यांत तब्बल 2 हजार 366 शेतकऱयांनी आत्महत्या केल्या होत्या.

यंदा अपुऱया पावसामुळे उत्पादकतेत मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. राज्यात प्रतिकूल हवामानामुळे पेरण्या झाल्या नाहीत. विलंबाने आलेल्या पावसामुळे पेरण्या लांबल्या. दुसरीकडे अवकाळीमुळे शेतकऱयांचे अतोनात नुकसान झाले आहे. नापिकी, शेतमालाला न मिळणारा भाव, कर्जबाजारीपणा, मुलांचे शिक्षण आणि अन्य घरगुती कारणांमुळे त्रासलेले शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत.

n राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सुरू झालेले शेतकऱयांच्या आत्महत्यांचे सत्र अजूनही थांबत नाही. राज्यात एकाही शेतकऱयाची आत्महत्या होऊ देणार नाही, अशी घोषणा राज्यात सत्तेत आल्यावर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती, पण मागील वर्षी केवळ दहा महिन्यांत 2 हजार 366 शेतकऱयांनी आत्महत्या केल्याची अधिकृत आकडेवारी आहे.

महसुली विभागानुसार शेतकऱयांच्या आत्महत्या

अमरावती 175
छत्रपती संभाजीनगर 146
नागपूर 54
नाशिक 48
पुणे 4
एकूण 427

अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरात सर्वाधिक आत्महत्या

राज्यात अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या महसूली विभागांमध्ये सर्वाधिक शेतकऱयांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांत अमरावती जिह्यात 48, तर विभागात 175 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्येही भीषण परिस्थिती आहे. विभागात दुष्काळाचे सावट आहे. पाणीटंचाई आणि रखरखत्या उन्हाने पिके उद्ध्वस्त झाली असून दोन महिन्यांत 146 शेतकऱयांनी मृत्यूला कवटाळले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;