शेतकऱ्यांना कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही, देवेंद्र फडणवीस म्हणतात

शेतकऱ्यांना कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही, देवेंद्र फडणवीस म्हणतात

शेतकरी कर्जमाफीचा निर्णय 30 जूनपर्यंत घेण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. त्याच फडणवीस यांनी आज कर्जमाफी नक्कीच महत्त्वाची आहे. पण कर्जमाफी हे शेती समस्येचा अंतिम उपाय नाही, अशी भूमिका मांडली. यामुळे शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.

कर्जमाफी नक्कीच महत्त्वाची आहे. आम्ही ती महत्त्वाचीच मानतो. पण कर्जमाफी हे शेती समस्येचा अंतिम उपाय नाही. यामुळे तात्पुरता दिलासा मिळतो, पण भविष्यातील संकट टळत नाही, अशी भूमिका फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.

शेती शाश्वत झाली पाहिजे

शेतीमध्ये शाश्वतता आणणे, उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे, उत्पादकता वाढली पाहिजे, तेव्हाच शेतकऱ्यांची खरी प्रगती होईल. शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट प्रकल्प आणि आधुनिक पद्धतींचा वापर हा काळाची गरज असून याच माध्यमातून शेती नफ्यात आणता येईल, असे फडणवीस म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उज्ज्वला थिटे यांनी गनिमी काव्याने दाखल केला अर्ज, गावाबाहेर गुंडांची गस्त… पहाटे 5 वाजता पोहचल्या नगरपंचायत कार्यालयात उज्ज्वला थिटे यांनी गनिमी काव्याने दाखल केला अर्ज, गावाबाहेर गुंडांची गस्त… पहाटे 5 वाजता पोहचल्या नगरपंचायत कार्यालयात
मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून अजित पवार गट व भाजपमध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले आहे. अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध...
Photo – शिवतीर्थावर निष्ठा आणि श्रद्धेचा महासागर!
तेथे कर माझे जुळती! शिवसेनाप्रमुखांना वंदन करण्यासाठी शिवतीर्थावर शिवसैनिकांची रीघ
महाराष्ट्रात 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका, अन्यथा निवडणुका रोखू! सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला फटकारले
शेतकऱ्यांना कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही, देवेंद्र फडणवीस म्हणतात
घाटकोपरच्या शाळेत 20 विद्यार्थ्यांना वडापाव बाधला
शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, मानवतेविरुद्ध गुन्हय़ाचा ठपका