उमराह यात्रेच्या परतीच्या प्रवासात काळाचा घाला; हैदराबादच्या कुटुंबातील तीन पिढ्यांतील 18 जणांचा मृत्यू
सौदी अरेबियातील मदानीजवळ सोमवारी झालेल्या बस अपघातात 45 हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला. या अपघातात उमराह यात्रेवरून परतत असताना हैदराबादमधील एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांचा अंत झाला. मृतांमध्ये 9 मुलांचा समावेश आहे. अपघातात नसीरुद्दीन, त्यांची पत्नी, तीन मुली, मुलगा, सून आणि नातवंडे यांचा मृत्यू झाला. या अपघातात केवळ एक प्रवासी बचावला आहे.
हैदराबादमधील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी नसीरुद्दीन (65) हे आपल्या कुटुंबासह उमराह यात्रेसाठी सौदी अरेबियात गेले होते. उमरा यात्रा झाल्यानंतर सर्वजण बसने मदिनाला परतत होते. मात्र वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. भाविकांची बस तेलाच्या टँकरला धडकली आणि अपघातग्रस्त झाली. या अपघातात नसीरुद्दीन यांच्या कुटुंबातील 18 सदस्यांसह बसमधील 45 हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नसीरुद्दीन यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List