अशा प्रकारे चहा पित असाल तर सावधान, प्रसिद्ध गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टचा सल्ला काय ?

अशा प्रकारे चहा पित असाल तर सावधान, प्रसिद्ध गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टचा सल्ला काय ?

भारतात आपण कोणाचे स्वागत करताना त्यांना चहा देत असतो. अनेकांची सकाळ तर चहा प्यायल्याशिवाय होतच नाही. त्यामुळे चहा पिण्याचे प्रमाण आपल्याकडे सर्वाधिक आहे. अनेकांना दूधाचा चहा पसंत असतो. तर काहीजण कोरा चहाच पिणे पसंद करतात. मात्र कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे प्रसिद्ध गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट यांनी चहा पिताना सावध राहाण्याचा सल्ला दिला आहे.

चहा पिण्याचे सवय मूळा चांगली नसून शक्य तितक्या लवकर ती सोडावी असे कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे प्रसिद्ध गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आणि हेपेटोलॉजिस्ट डॉ. दीपक भांगले यांनी म्हटले आहे. जेवढा जास्त चहा प्याल तेवढे प्रकृतीसाठी चांगले नाही. त्यात जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने चहा पित असाल तर तुमच्या पोटासाठी ते चांगले नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

कसे पिता चहा ?

बहुतांशी लोक चहा पिताना सकाळी रिकाम्या पोटी पितात आणि तिही कडक चहा पितात. किंवा चहा सोबत बिस्कीट, टोस्ट, खारी, मठरी खातात. चहा पिण्याची ही पद्धत हळूहळू तुमच्या लिव्हरला डॅमेज करु शकते. आणि आतड्यांचेही नुकसान करु शकते. चहात टॅनिन नावाचे तत्व असते. जे शरीरात मिसळते. जर तुम्ही खूप कडक चहा पित असाल तर त्याने पोटात एसिडीटी आणि छातीत जळजळ होऊ शकते.

चहा आणि स्नॅक्स

चहा सोबत मसालेदार, तळलेले – भाजलेले स्नॅक्स पदार्थ खात असाल तर हे पोटाच्या पडद्याला ( अस्तराला ) कमजोर करतात. त्यामुळे पोटात अधिक एसिड तयार होते. जेऊन उशीरा पचते. त्यामुळे पोटदुखी, अपचन, बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते.

चहा कसा प्यावा ?

तुम्ही चहाचे प्रमाण थोडे कमी करु शकला तर चांगले आहे. जर करु शकत नसाल तर चहा कधीही उपाशी पोटी पिऊ नका. हल्का नाश्ता करुन चहा प्यावा. नाश्त्यात काहीही हेल्दी पर्याय निवडा. सकाळी आधी कोमट पाणी प्या आणि नंतर चहा पिऊ शकता. हर्बल आणि आल्याचा चहा प्या आणि त्यात साखर कमी टाका. साखर आतड्यातील गुड बॅक्टेरियांना संपवत असेही डॉ. भांगले यांनी म्हटले आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

थायरॉईडच्या समस्येत कोणती योगासने फायद्याची ? रामदेव बाबांचा सल्ला काय ? थायरॉईडच्या समस्येत कोणती योगासने फायद्याची ? रामदेव बाबांचा सल्ला काय ?
थायरॉईड पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक होणारा आजार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे महिलांमध्ये होणारे हॉर्मोनल बदल जसे पीरियड्स, प्रेग्नंसी आणि...
दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एक अटक, NIAने दहशतवादी उमरच्या आणखी एका साथीदाराला ठोकल्या बेड्या
Sindhudurg News – कणकवली भाजपाविरुद्ध क्रांतिकारी विचार पक्षामध्ये लढत, नगरपंचायतसाठी 62 जणांचे अर्ज दाखल
Ratnagiri News – नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून शिवानी सावंत-माने यांचा उमेदवारी अर्ज
उमराह यात्रेच्या परतीच्या प्रवासात काळाचा घाला; हैदराबादच्या कुटुंबातील तीन पिढ्यांतील 18 जणांचा मृत्यू
रत्नागिरीच्या राजकारणात 21 वर्षांपासून लबाड लांडगा, उदय सामंतांनी 44 कोटींच्या डांबराचे चलन दाखवावे; बाळ माने यांचे आव्हान
मानव-वन्यजीव संघर्षाचा ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून विचार करा, पीडितांना 10 लाखांचे सानुग्रह अनुदान द्या; सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना निर्देश