मीरा-भाईंदरच्या समुद्रात विषारी जेलीफिशची दहशत, मच्छीमारांवर उपासमारीची वेळ

मीरा-भाईंदरच्या समुद्रात विषारी जेलीफिशची दहशत, मच्छीमारांवर उपासमारीची वेळ

कधी मुसळधार पाऊस तर कधी वादळी वाऱ्याचे तडाखे सहन केल्यानंतर काही दिवसांपूर्वी मासेमारी सुरू झाली. आता तरी भरपूर मासे मिळून दोन पैसे मिळतील अशी मच्छीमारांची अपेक्षा होती. पण आता मीरा-भाईंदरच्या समुद्रात विषारी जेलीफिशची दहशत निर्माण झाली असून पुन्हा एकदा मच्छीमारांवर संकट ओढवले आहे. जाळ्यात मासळी येण्याऐवजी चक्क जेलीफिशच सापडत असल्याने मच्छीमार हैराण झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.

वसईच्या नायगाव, अर्नाळा, भाईंदर उत्तन भागातील अनेक मच्छीमार बांधव समुद्रात मासेमारी करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदलामुळे खोल समुद्रातील जेली फिश सध्या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. जेलीफिशचा साधा स्पर्श जरी झाला तरी अंगाची आग होते. जेलीफिशचे 27 प्रकार असून त्याचे वजन 100 ग्रॅम ते 10 किलो इतके असते. ज्या ठिकाणी जेलीफिश असतात त्याठिकाणी अन्य माशांच्या प्रजाती थांबत नाहीत. त्यामुळे मासे मिळणेही कठीण झाले असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. या जेलीफिशला जाळ्यातून बाहेर काढताना खूप प्रयत्न करावे लागतात.

आर्थिक नुकसान
जाळ्यांमधून जेलीफिश काढताना अनेकदा मच्छीमारांना दुखापती होतात. या गंभीर समस्येकडे शासनाने लक्ष देऊन मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्याची मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी केली आहे.

विषारी जेलीफिश जाळ्यात अडकल्यावर ते जाळे फाडून टाकतात. एकाच वेळेत मोठ्या प्रमाणात जेलीफिश जाळ्यात अडकल्यामुळे जाळे समुद्रातून बोटीवर आणतानाही प्रचंड मेहनत करावी लागते. जेलीफिशमुळे जाळ्यात आलेले मासेही पुन्हा समुद्रात सोडावे लागतात. त्यामुळे मोठे नुकसान होते. – मेलकम भंडारी, स्थानिक मच्छीमार

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं, राज ठाकरेंनी वाहिली आदरांजली बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं, राज ठाकरेंनी वाहिली आदरांजली
बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदू अस्मिता जागी केली असे विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. तसेच बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून...
दिवसभर चपाती मऊ राहण्यासाठी ‘या’ टिप्स आहेत खूप महत्त्वाच्या
सौदी अरेबियामध्ये बसचा भीषण अपघात, 42 हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू
ब्लँकेट आणि स्वेटर वॉशिंग मशीनमध्ये धुण्यासाठी या टिप्सचा वापर करावा, वाचा
लॅपटॉपची स्क्रीन पुसायची असेल तर… हे करून पहा
रस्ते अडवले, पाठलाग केला; निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून भाजपने उभी केली गुंडांची फौज, उज्ज्वला थिटेंनी पहाटे भरला अर्ज
असं झालं तर… आधारशी लिंक असलेला मोबाइल क्रमांक बंद झाला…