सत्याच्या मोर्चावर गुन्हा दाखल

सत्याच्या मोर्चावर गुन्हा दाखल

निवडणूक आयोगाविरुद्ध मुंबईत शनिवारी विराट महामोर्चा काढण्यात आला. असत्याविरोधात निघालेल्या या सत्याच्या मोर्चावर मुंबई पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला आहे. परवानगी नसताना मोर्चा काढण्यात आला. प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करण्यात आले, असे कारण देत आझाद मैदान पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतदार याद्यांतील गोंधळ आणि मतचोरीविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी दोन वेळा राज्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन पुरावे दिले होते. मात्र आयोगाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. त्याच्या निषेधार्थ शनिवारी फॅशन स्ट्रीटपासून मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत सत्याचा महामोर्चा काढण्यात आला. या सर्वपक्षीय मोर्चासाठी पोलिसांकडे अर्जाद्वारे रीतसर परवानगी मागण्यात आली होती. मात्र मोर्चाला परवानगी दिली गेली नाही. त्यानंतरही विराट मोर्चा निघाला. त्यामुळे आयोजकांविरुद्ध बेकायदेशीर जमाव गोळा करणे, कायद्याचे पालन न करणे, प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याचे नमूद करत आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरोधकांच्या आक्षेपानंतर भाजपच्या मूक आंदोलनावर गुन्हा

सत्याच्या मोर्चाला विरोध करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी शनिवारी मूक आंदोलन केले होते. पोलिसांची परवानगी न घेता हे आंदोलन करणाऱयांवर गुन्हा का नाही, असा सवाल विरोधी पक्षांनी केला होता. त्या आक्षेपानंतर या आंदोलनाच्या आयोजकांवरही डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

केंद्राचं पथक दोन-तीन दिवसांत मराठवाड्याचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा कसा करणार? उद्धव ठाकरेंचा सवाल; राज्य सरकारकडून कोणाताही प्रस्ताव केंद्राकडे गेलेला नाही केंद्राचं पथक दोन-तीन दिवसांत मराठवाड्याचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा कसा करणार? उद्धव ठाकरेंचा सवाल; राज्य सरकारकडून कोणाताही प्रस्ताव केंद्राकडे गेलेला नाही
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेत शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारचा समाचार घेतला. खरिपाचा...
बिबट्याच्या हल्ल्याने ग्रामस्थ संतप्त, पुणे-नाशिक महामार्गावर केला रास्ता रोको
सहा वर्षानंतर मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट पुन्हा एकत्र, ‘या’ रहस्यमय चित्रपटात दिसणार केमिस्ट्री
मद्यधुंद व्यक्तीने तरुणीला चालत्या ट्रेनमधून फेकले; आरोपीला अटक
पाकिस्तान अणुचाचण्या करत आहे; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
कोलकत्ता हादरलं, 14 वर्षीय विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार; आरोपीला अटक
ट्रम्प यांची नवी खेळी! पुतिन, जिनपिंग यांचे केले कौतुक; या चतुर नेत्यांसोबत व्यापार करार कठीण असल्याचे केले स्पष्ट