देवा रे देवा… अजब सरकार गजब न्याय! वाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्याला पीक विम्याचे 2 रुपये 30 पैसे!!

देवा रे देवा… अजब सरकार गजब न्याय! वाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्याला पीक विम्याचे 2 रुपये 30 पैसे!!

>> वसंत भोईर

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. पण अद्यापि एक छदामही मिळालेला नाही. वाड्यातील शिलोत्तर गावातील पूरग्रस्त शेतकरी मधुकर पाटील यांची तर क्रूर थट्टा केली आहे. सरकारची भरपाई सोडाच, पण पाटील यांच्या बँक खात्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे फक्त 2 रुपये 30 पैसे जमा झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अजब सरकारच्या या गजब न्यायामुळे देवा रे देवा… हीच का नरेंद्र मोदी यांच्या सरकारची पीक विमा हमी, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

पालघर जिह्यात शेतकरी भाताचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. वाडा तालुक्यातील शिलोत्तर गावात राहणारे मधुकर पाटील यांनी सात एकर जमिनीमध्ये भाताची लागवड केली होती. सुमारे 80 हजार रुपये त्यासाठी खर्च केले. हे पीक व्यवस्थित आले असते तर त्यांना अंदाजे दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असते. मात्र हे पीक पावसाने उद्ध्वस्त करून टाकले.

… आणि पायाखालची जमीनच सरकली

मधुकर पाटील यांचे 80 टक्क्यांहून अधिक पीक आडवे झाले. त्यांनी संपूर्ण शेतीचा पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत विमा उतरवला होता. फडणवीस सरकारने दिवाळी संपून गेली तरी मदतीचा शब्द पाळला नाही. त्यामुळे किमान पंतप्रधान पीक विमा योजनेतून तरी थोडेफार पैसे मिळतील अशी त्यांना आशा होती. 31 ऑक्टोबर रोजी पाटील यांच्या आयडीबीआय बँक खात्यात पीक विमा कंपनीकडून पैसे जमा झाले. तसा त्यांच्या मोबाईलवर मेसेजदेखील आला, पण त्यावरील रक्कम पाहताच मधुकर पाटील यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ही रक्कम होती फक्त 2 रुपये 30 पैसे. त्यांच्या कुटुंबालाही आश्चर्याचा धक्का बसला.

  • मधुकर पाटील यांना पत्नी, एक मुलगी व एक मुलगा आहे. मुलगा 11वीत असून मुलीचे लग्न झाले आहे. उदरनिर्वाह कसा करायचा या चिंतेने त्यांना ग्रासले आहे.

मोदींनी आम्हाला फसवले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पीक विमा योजना आहे. त्यातून मिळणाऱया पैशातून काहीसा दिलासा मिळेल असे वाटले होते. अवकाळी पावसानंतर राज्य सरकारने पॅकेज जाहीर केले, पण त्याचा एक रुपयाही अजून मिळालेला नाही. आता तर थेट मोदींनीच मला फसवले असून देवा… आता दाद कुणाकडे मागू, असा आर्त सवाल मधुकर पाटील या शेतकऱयाने केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

केंद्राचं पथक दोन-तीन दिवसांत मराठवाड्याचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा कसा करणार? उद्धव ठाकरेंचा सवाल; राज्य सरकारकडून कोणाताही प्रस्ताव केंद्राकडे गेलेला नाही केंद्राचं पथक दोन-तीन दिवसांत मराठवाड्याचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा कसा करणार? उद्धव ठाकरेंचा सवाल; राज्य सरकारकडून कोणाताही प्रस्ताव केंद्राकडे गेलेला नाही
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेत शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारचा समाचार घेतला. खरिपाचा...
बिबट्याच्या हल्ल्याने ग्रामस्थ संतप्त, पुणे-नाशिक महामार्गावर केला रास्ता रोको
सहा वर्षानंतर मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट पुन्हा एकत्र, ‘या’ रहस्यमय चित्रपटात दिसणार केमिस्ट्री
मद्यधुंद व्यक्तीने तरुणीला चालत्या ट्रेनमधून फेकले; आरोपीला अटक
पाकिस्तान अणुचाचण्या करत आहे; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
कोलकत्ता हादरलं, 14 वर्षीय विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार; आरोपीला अटक
ट्रम्प यांची नवी खेळी! पुतिन, जिनपिंग यांचे केले कौतुक; या चतुर नेत्यांसोबत व्यापार करार कठीण असल्याचे केले स्पष्ट