भाऊबीज म्हणजे यम द्वितीया; जाणून घ्या पौराणिक महत्त्व…

भाऊबीज म्हणजे यम द्वितीया; जाणून घ्या पौराणिक महत्त्व…

भाऊबीज ज्याला यम द्वितीया म्हणूनही ओळखले जाते. हा सण दिवाळीच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. हा सण भाऊ आणि बहिणींमधील प्रेम, त्याग आणि भक्तीचे प्रतीक आहे. भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. ऋग्वेद आणि पुराणांमध्ये या सणाचा उल्लेख आहे. त्यामुळे तो दिवाळीचा सर्वात प्राचीन सण असल्याचे मानले जाते. भाऊबीजेला यमद्वितीया का म्हणतात आणि यामागील पौराणिक कथा जाणून घेऊ या.

हा भाऊ आणि बहिणीमधील प्रेम, त्याग आणि भक्तीचा सण आहे. भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. तर बहिण आपल्या भावांना आमंत्रित करतात, त्यांना ओवाळतात आणि शुभेच्छा देतात आणि त्यांना जेवू घालतात. यम द्वितीया किंवा भाऊबीज सणाचा उल्लेख ऋग्वेदात आहे. ऋग्वेदातील दहाव्या मंडळाच्या संवद सूक्तात या घटनेचे वर्णन केले आहे. या संवाद सूक्तात यम आणि त्याची बहीण यमुना (यमी) यांच्यातील संभाषण नोंदवले आहे. संवाद सूक्त भारतीय व्यवस्थेतील कुटुंबाच्या मूल्यांवर आणि आदर्शांवर प्रकाश टाकते आणि प्रत्येक नात्याची मर्यादा देखील अधोरेखित करते.

यम आणि यमीची कथा विष्णू पुराण, कूर्म पुराण आणि मार्कंडेय पुराणात विविध संदर्भांसह सांगितली आहे. विष्णू पुराणानुसार, यम एके दिवशी त्याची बहीण यमीच्या घरी पोहोचला. यम म्हणजे मृत्यूची देवता, त्यामुळे यम म्हटले की सर्वांनाच धास्ती असते. मात्र, यमी तिच्या भावाला पाहून खूप आनंदी झाली. यमीने यमाला मोठ्या आदराने बसवले, स्वादिष्ट पक्वान्न तयार केले आणि त्याला जेवू घातले. पहिल्यांदाच अशा प्रकारचे आदरातिथ्य पाहून यमाला खूप आनंद झाला आणि त्याने यमीला वरदान मागण्यास सांगितले. यमीने स्वतःसाठी काहीही मागितले नाही, उलट असे म्हटले की ज्या बहिणी या दिवशी आपल्या भावाला आनंदाने जेवू घाततील त्यांच्यावर कृपा ठेव. त्या घरात अकाल मृत्यूचे भय नसावे. त्यावर या दिवशी जो भाऊ बहिणीच्या घरी जाईल. तिचा सन्मान करेल आणि तिची काळजी घेतली त्याला कधीही अकाली मृत्यूची भीती वाटणार नाही, असा आशिर्वाद यमाने दिला, अशा प्रकारे भाऊबीजेची प्रथा रुढ झाली असे सांगण्यात येते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठा अनर्थ टळला ! स्फोटानंतर रुळांना नुकसान; गाड्या उशीरा धावल्या मोठा अनर्थ टळला ! स्फोटानंतर रुळांना नुकसान; गाड्या उशीरा धावल्या
आसाममध्ये मोठ्या अपघाताचा अनर्थ टळला आहे. ईशान्य सीमावर्ती रेल्वेच्या अलीपुरद्वार विभागातील सालाकाटी आणि कोक्राझार स्थानकांदरम्यान गुरुवारी रेल्वे रुळांवर एक संशयास्पद...
Bihar Election 2025 – तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार; महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत अशोक गहलोत यांची घोषणा
दिल्लीहून पाटण्याला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात हवेतच बिघाड; सतर्कता दाखवत वैमानिकाने विमान दिल्लीकडे वळवले
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात संगमेश्वरचा 114 वर्ष जुना ब्रिटीशकालीन डाकबंगला जमीनदोस्त होणार
ट्रेंडिंग ‘कार्बाइड गन’ पडली महागात; दिवाळीत खेळताना १४ मुलांनी डोळे गमावले
भाजप संधीसाधू, यूज अँड थ्रो हेच त्यांचे धोरण; अंबादास दानवे यांची सडकून टीका
‘या’ आहेत देशातील 5 सर्वात स्वस्त CNG कार, मिळणार जबरदस्त मायलेज; किमती ४.६२ लाख रुपयांपासून सुरू; पाहा संपूर्ण लिस्ट…