पंतप्रधान मोदींचे भाषण ‘कोरडे’, पूरग्रस्त महाराष्ट्राचा साधा उल्लेखही नाही

पंतप्रधान मोदींचे भाषण ‘कोरडे’, पूरग्रस्त महाराष्ट्राचा साधा उल्लेखही नाही

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन झाले. पण एकीकडे मराठवाड्यात पूराने शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांबद्दल अवाक्षरी काढले नाही. या वेळी पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांबद्दल आपली संवेदनाही व्यक्त केली नाही.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी त्यांनी स्वदेशी वस्तू विकत घ्या म्हणत स्वदेशीचा नारा दिला. पण मराठवाड्यात पूर आला आहे त्याचा साधा उल्लेखही पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात केला नाही. मराठवाड्यात आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यात राज्य सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केल्याची टीका विरोधकांनी केली आहे. अशा वेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात पूरग्रस्त शेतकऱ्यांचा साधा उल्लेखही केला नाही. त्यामुळे यावेळचे पंतप्रधान मोदींचे भाषण कोरडे झाले अशी चर्चा होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;