बिहारच्या चार कुख्यात गँगस्टरचं दिल्लीत एन्काऊंटर, विधानसभा निवडणुकीत दहशत पसरवण्याचा होता डाव

बिहारच्या चार कुख्यात गँगस्टरचं दिल्लीत एन्काऊंटर, विधानसभा निवडणुकीत दहशत पसरवण्याचा होता डाव

एकीकडे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना राजधानी दिल्लीमध्ये बिहारच्या चार कुख्यात गँगस्टरचे एन्काऊंटर करण्यात आले. बुधवारी मध्यरात्री रोहिणी येथे ही चकमक झाली. यात रंजन पाठक टोळीतील चार जण ठार झाले. दिल्ली पोलीस आणि बिहार पोलिसांच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली. विधानसभा निवडणुकीमध्ये दहशत परवण्याचा कट या सर्वांनी रचला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बिहारमधील अनेक खून प्रकरणात सहभागी असलेली रंजन पाठक टोळी विधानसभा निवडणुकीवेळी दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. ही टोळी दिल्लीत लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि बिहार पोलिसांनी या टोळीला पकण्यासाठी सापळा रचला. रोहिणी भागामध्ये पोलिसांनी या टोळीला घेराव घातला. यावेळी पोलीस आणि रंजन पाठक टोळीमध्ये चकमक उडाली.

बुधवारी मध्यरात्री 2 वाजून 20 मिनिटांनी रोहिणी येथे ही चकमक झाली. बहुदार शाह मार्गावरील डॉक्टर आंबेडकर चौक ते पंसाली चौक दरम्यान ही चकमक सुरू होती. यावेळी पोलीस आणि रंजन पाठक टोळीमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. दोन्ही बाजूने तुफान गोळीबार झाला. यावेळी चारही गँगस्टर पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाले. त्यांना रोहिणी येथील डॉ. बीएसए रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस चकमकीमध्ये ठार झालेल्या गँगस्टरची ओळखही पटली आहे. रंजन पाठक (वय – 25), बिमलेश महतो उर्फ बिमलेश साहनी (वय – 25), मनीष पाठक (वय – 33, तिघे राहणार सीतामढी, बिहार) आणि अमन ठाकूर (वय – 21, रा. शेरपूर, करावल नगर, दिल्ली) अशी मृतांची नावे आहेत. त्यांच्यावर खून, खंडणीसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठा अनर्थ टळला ! स्फोटानंतर रुळांना नुकसान; गाड्या उशीरा धावल्या मोठा अनर्थ टळला ! स्फोटानंतर रुळांना नुकसान; गाड्या उशीरा धावल्या
आसाममध्ये मोठ्या अपघाताचा अनर्थ टळला आहे. ईशान्य सीमावर्ती रेल्वेच्या अलीपुरद्वार विभागातील सालाकाटी आणि कोक्राझार स्थानकांदरम्यान गुरुवारी रेल्वे रुळांवर एक संशयास्पद...
Bihar Election 2025 – तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार; महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत अशोक गहलोत यांची घोषणा
दिल्लीहून पाटण्याला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात हवेतच बिघाड; सतर्कता दाखवत वैमानिकाने विमान दिल्लीकडे वळवले
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात संगमेश्वरचा 114 वर्ष जुना ब्रिटीशकालीन डाकबंगला जमीनदोस्त होणार
ट्रेंडिंग ‘कार्बाइड गन’ पडली महागात; दिवाळीत खेळताना १४ मुलांनी डोळे गमावले
भाजप संधीसाधू, यूज अँड थ्रो हेच त्यांचे धोरण; अंबादास दानवे यांची सडकून टीका
‘या’ आहेत देशातील 5 सर्वात स्वस्त CNG कार, मिळणार जबरदस्त मायलेज; किमती ४.६२ लाख रुपयांपासून सुरू; पाहा संपूर्ण लिस्ट…