भाजप संधीसाधू, यूज अँड थ्रो हेच त्यांचे धोरण; अंबादास दानवे यांची सडकून टीका

भाजप संधीसाधू, यूज अँड थ्रो हेच त्यांचे धोरण; अंबादास दानवे यांची सडकून टीका

भारतीय जनता पक्ष संधीसाधून असून यूज अँड थ्रो हेच त्यांचे धोरण असल्याची सडकून टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी केली. ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशीचीही मागणी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत महायुती एकत्र लढेल असे विधान केले. याबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, भाजप संधीसाधू आहबे. मुंबईत ताकद नाही म्हणून त्यांना इतरांना सोबत घ्यायचे आहे. ठाणे, पिंपरी चिंचवड, पुणे, नाशिकसह संभाजीनगर येथे ताकद नसेल तिथे त्यांना डावलायचे ही भाजपची पद्धत आहे. यूज अँड थ्रो हे भाजपचे धोरण आहे.

मुंबईत त्यांना गरज आहे. मुंबई बाळासाहेबांची, उद्धव ठाकरे यांची शिवसेना मजबूत आहे. जनता शिवसेनेच्या मागे आहे. तिचा मुकाबला एकट्याने करणे शक्य नाही म्हणून तिथे एकत्र व्हायचे. बाकीच्या ठिकाणी यांना दूर करायचे ही फडणवीस आणि भाजपची दुहेरी निती आहे, असेही दानवे म्हणाले.

बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा झेंडा मुंबईवरून उतरवणं हेच महायुतीचं अंतिम ध्येय, म्हणून इथे ते एकत्र लढायला तयार; संजय राऊत यांचा घणाघात

पुण्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर दानवे म्हणाले की, रवींद्र धंगेकर जे बोलले त्याची चौकशी झाली पाहिजे आणि सत्यता समोर आली पाहिजे. धंगेकर यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले आहे. केंद्रातील सत्ता आणि राज्यातील सत्तेचा मोहोळ वापर करतात हे स्पष्ट आहे. त्यामुळे धंगेकर यांच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी दानवे यांनी केली.

मुरलीधर मोहोळ अजूनही गोखले बिल्डरच्या कंपनीचे भागीदार, रवींद्र धंगेकर यांचा गंभीर आरोप

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शुद्ध देशी तुपाच्या दिव्याचे धार्मिक महत्त्वच नाही तर अनेक आरोग्यदायी फायदेही, जाणून आश्चर्य वाटेल शुद्ध देशी तुपाच्या दिव्याचे धार्मिक महत्त्वच नाही तर अनेक आरोग्यदायी फायदेही, जाणून आश्चर्य वाटेल
पूजा करताना, कोणत्याही धार्मिक विधी करताना तसेच सणांच्यादिवशी दिवे निश्चितच लावले जातात. पूजेदरम्यान शुद्ध देशी तुपाच्या दिव्यांचे फार महत्त्व सांगितले...
नॉनवेज,पिझ्झा-बर्गरपेक्षादेखील हा गोड पदार्थ लिव्हरसाठी असतो सर्वात धोकादायक
माजी आमदार मुन्ना शुक्ला यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; एकाला अटक
ये डर अच्छा है! सोन्याचा स्ट्रॉ हरवल्याचे दुःख नाही; बायकोच्या शिक्षेची भीती वाटते…जाणून घ्या घटना
लक्ष लक्ष दिव्यांनी कोकणची दक्षिण काशी उजळली ! कुणकेश्वर मंदिरात दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
मोठा अनर्थ टळला ! स्फोटानंतर रुळांना नुकसान; गाड्या उशीरा धावल्या
Bihar Election 2025 – तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार; महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत अशोक गहलोत यांची घोषणा