‘१५ जागा मिळाल्या नाहीत तर निवडणूक लढवणार नाही’; भाजपच्या मित्रपक्षाने दिला इशारा

‘१५ जागा मिळाल्या नाहीत तर निवडणूक लढवणार नाही’; भाजपच्या मित्रपक्षाने दिला इशारा

बिहार निवडणुकीच्या तोंडावर एडीएमध्ये सारे काही आलबेल नाही हे आता समोर आले आहे. एनडीएमध्ये जागा वाटपावरून प्रचंड अस्वस्थता असल्याचे संकेत मिळत आहेत. मित्रपक्ष जीतन राम मांझी यांनी भाजपला थेट इशाराच दिला आहे. जर त्यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चा (एचएएम) या पक्षाला किमान १५ जागा मिळाल्या नाहीत, तर ते निवडणूक लढवणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.

‘आम्ही एनडीएच्या नेत्यांना विनंती करत आहोत कारण आम्हाला अपमानित झाल्यासारखे वाटत आहे. आम्हाला सन्मानपूर्वक जागांची संख्या मिळाली पाहिजे, ज्यामुळे आमच्या पक्षाला ओळख मिळेल. जर आम्हाला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत, तर आम्ही निवडणूक लढवणार नाही’, असे मांझी यांनी म्हटले आहे.

मात्र , मांझी यांनी आपला पक्ष एनडीएला सोबतच राहील असेही स्पष्ट केले आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मांझी यांची समजूत काढण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधल्याचेही समजते. आम्ही एनडीएला पाठिंबा देऊ, पण निवडणूक लढवणार नाही. मला मुख्यमंत्री बनायचे नाहीये, मला फक्त आमच्या पक्षाला ओळख मिळवून द्यायची आहे’, असे मांझी म्हणाले.

यापूर्वी, बिहार निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत पक्षाची मागणी काय आहे, याचा संकेत देण्यासाठी मांझी यांनी महान कवी रामधारी सिंह ‘दिनकर’ यांच्या ओळींमध्ये बदल करून ’15 गावे’ म्हणजेच 15 जागांची मागणी केली होती.
एनडीए मधील घटक पक्षांनी अजूनही बिहार निवडणुकीसाठी त्यांच्या जागावाटपाची घोषणा केलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 243 जागांपैकी JDU आणि भाजप प्रत्येकी 100 जागांवर निवडणूक लढवू शकतात. चिराग पासवान यांच्या LJP (राम विलास) ला 24, मांझी यांच्या पक्षाला 10 आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षाला सुमारे 6 जागा मिळू शकतात. मांझी यांच्या व्यतिरिक्त चिराग पासवान देखील या आकड्यावर नाराज असून ते किमान 40 जागांसाठी जोर देत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;