रत्नागिरीत मधुमेह, रक्तदाब पाठोपाठ कर्करोग रूग्णांची संख्या वाढतेय, आरोग्य तपासणीतून पुढे आली माहिती

रत्नागिरीत मधुमेह, रक्तदाब पाठोपाठ कर्करोग रूग्णांची संख्या वाढतेय, आरोग्य तपासणीतून पुढे आली माहिती

रत्नागिरी जिल्हापरिषदेने राबवलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानातंर्गत आरोग्य तपासणीतून धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. 3 हजार ८३९ आरोग्य तपासणी शिबिरातून दोन लाख नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मधुमेहाचे ३० हजार ९८५ रूग्ण सापडले.उच्च रक्तदाबाचे २८ हजार ३०२ रूग्ण सापडले आहेत.कर्करोगाचे १४ हजार ७७७ रूग्ण सापडले आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय व जिल्हा शासकीस रूग्णालयात ही आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली. याशिबिरात कर्करोगाचे १४ हजार ७७७ रूग्ण सापडले.त्यामध्ये मुख कर्करोगाचे ७ हजार ४६४ रूग्ण, स्तन कर्करोगाचे ३ हजार ६७९ रूग्ण,गर्भाशय मुख कर्करोगाचे ३ हजार ७३४ रूग्ण सापडले आहेत. रक्तक्षयाचे ४३ हजार २७६ रूग्ण सापडले आहेत.त्यामध्ये ३२ हजार २०८ महिला आणि ११ हजार ६८ पुरूष रूग्ण आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कुर्नूलनंतर रांचीत बसमध्ये अग्नितांडव, 40 हून अधिक प्रवासी थोडक्यात बचावले कुर्नूलनंतर रांचीत बसमध्ये अग्नितांडव, 40 हून अधिक प्रवासी थोडक्यात बचावले
कुर्नूलमधील बसला आग लागल्याची घटना ताजी असतानाच झारखंडमधील रांची येथे बसला आग लागली. शनिवारी संध्याकाळी प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला आग...
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनात अंदाधुंद गोळीबार, दोघांचा मृत्यू; 13 जण जखमी
संपूर्ण जीवनात महिला किती किलो लिपस्टीक खातात ? जाणून बसेल धक्का
भारतात श्वास घेणंही कठीण, प्रदूषणामुळे गेल्या 10 वर्षांत 38 लाख जणांचा मृत्यू
एमडी होण्याचे स्वप्न भंगले… शैक्षणिक कर्जही फिटले नाही; आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
औषध कंपन्यांनी भाजपला ९४५ कोटी रुपयांची दिली देणगी, सिरपमुळे होणाऱ्या मृत्यूंबद्दल दिग्विजय सिंह यांचा दावा
भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी; निर्णयाकडे देशभरातील प्राणीप्रेमींचे लक्ष